देशातील तरुणांशी थेट संवाद साधण्यावर सध्या राजकीय पातळीवर भर दिला जात आहे. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीने ‘क्या बोलती पब्लिक’ या अभियानाची सुरुवात करत देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे, आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत तरुणांशी संवाद साधला.या दोन्ही घडामोडींवर Gen Z अर्थात तरुण पिढी नेमकं काय म्हणते? काही तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टी आमच्या प्रश्नांना आवाज देत असल्याचं सांगत ‘क्या बोलती पब्लिक’ या उपक्रमाचं स्वागत केलं. तर काहींनी मोहन भागवत यांच्या संवादाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. याशिवाय काही तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या राजकीय भूमिकेबाबतही टीका केली.
देशातील तरुणांशी थेट संवाद साधण्यावर सध्या राजकीय पातळीवर भर दिला जात आहे. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीने ‘क्या बोलती पब्लिक’ या अभियानाची सुरुवात करत देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे, आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत तरुणांशी संवाद साधला.या दोन्ही घडामोडींवर Gen Z अर्थात तरुण पिढी नेमकं काय म्हणते? काही तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टी आमच्या प्रश्नांना आवाज देत असल्याचं सांगत ‘क्या बोलती पब्लिक’ या उपक्रमाचं स्वागत केलं. तर काहींनी मोहन भागवत यांच्या संवादाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. याशिवाय काही तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या राजकीय भूमिकेबाबतही टीका केली.