Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…शेख हसीना यांच्या जाण्याने देशात शांतता’, BNP नेत्याचा माजी पंतप्रधानांना टोमणा; भारतावरही गंभीर आरोप

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) वरिष्ठ नेते राहुल कबीर रिजवी यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि भारतावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, शेख हसीना यांनी बांगलादेशातून जाण्याने देशात शांतता परतली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 03, 2024 | 12:48 PM
'...शेख हसीना यांच्या जाण्याने देशात शांतता', BNP नेत्याचा माजी पंतप्रधानांना टोमणा; भारतावरही गंभीर आरोप

'...शेख हसीना यांच्या जाण्याने देशात शांतता', BNP नेत्याचा माजी पंतप्रधानांना टोमणा; भारतावरही गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) वरिष्ठ नेते राहुल कबीर रिजवी यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि भारतावर गंभीर आरोप केले आहेत. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले आहे की, शेख हसीना यांनी बांगलादेशातून भारतात पळ काढल्याने देशात शांतता परतली आहे. त्यांनी दावा केला की, 15 वर्षांपासून नागरिकांच्या खांद्यावर असलेला भार आता उतरला आहे. आता बांगलादेश शेख हसीना यांना परत स्वीकारणार नाहीत.

शेख हसीना आणि भारतावरही आरोप

इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रिजवी यांनी शेख हसीना यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, त्यांच्या जाण्याने बांगलादेशातील विविध जाती-धर्मांच्या लोकांमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. देशात आता शांततेचे वातावरण आहे. तसेच भारतावर टिका करताना त्यांनी म्हटले आहे की, भारताचे बांगलादेशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे चुकीच आहे. यामुळे बांगलादेशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पंतप्रधान मोदींचे पुतिन यांना आमंत्रण; भारत-रशिया संबंधाची नवी सुरूवात

भारताचा हस्तक्षेप बांगलादेशासाठी धोकादायक

बीएनपी नेत्यांनी भारत सरकारवर बांगलादेशाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, भारत सरकार बांगलादेशाला आपला ‘आठवा भाऊ’ बनवण्याचा प्रयत्न करत आहे, यामुळे त्यांच्या ईशान्येकडील सात राज्यांना सुरक्षित ठेवता येईल. त्यांनी हे म्हटले आहे की, भारताचे हे धोरण बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहे.

शेख हसीना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

भारतीय मीडियावरही आरोप

रिजवी यांनी भारतीय प्रसारमाध्यमांवर देखील आरोप केले आहेत. प्रसारमाध्यमांवर आरोप करताना त्यांनी  म्हटले आहे की, शेख हसीना यांच्या देशातून गेल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि भारतीय प्रसारमाध्यमांनी खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याच्या खोट्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. यातून ते सांप्रदायिक तणाव निर्माण करत असल्याचा त्यांनी दावा केला.

अवामी लीगवर बंदी

याशिवाय, रिजवी यांनी स्पष्ट केले की, अवामी लीगवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारचा आहे आणि त्यासाठी बीएनपीला दोष देणे योग्य नाही. त्यांनी आवाहन केले की अंतरिम सरकारने अशी विधाने करू नयेत ज्यामुळे लोकशाही शक्ती कमकुवत होतील. रिजवी यांच्या या विधानांमुळे बांगलादेशातील राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे भारत-बांगलादेश संबंध बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराचा भारताकडून निषेध

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा भारतातही तीव्र निषेध होत आहे. शुक्रवारी भारताने बांगलादेशमध्ये अतिरेकी वक्तृत्व आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताने बांगलादेशी सरकारसमोर हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा सातत्याने मांडला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Violence: चिन्मय दास यांच्या जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Web Title: Bangladesh news bnp leader rahul rizvi says peace and tranquility in bangladesh after sheikh hasina fled nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 06:13 PM

Topics:  

  • Bangladesh
  • shaikh hasina
  • world

संबंधित बातम्या

Shrabanti Ghosh: ‘बेडवर टेकलेले पाय अन् मानेवर जखम’ बांगलादेशात 12 वर्षीय हिंदू मुलीचा संशयास्पद मृत्यू; दोन संशयित ताब्यात
1

Shrabanti Ghosh: ‘बेडवर टेकलेले पाय अन् मानेवर जखम’ बांगलादेशात 12 वर्षीय हिंदू मुलीचा संशयास्पद मृत्यू; दोन संशयित ताब्यात

बांगलादेशात निवडणुकीपूर्वी पुन्हा राजकीय हिंसाचार; BNP पक्षाच्या युवा नेत्याची गोळ्या घालून हत्या 
2

बांगलादेशात निवडणुकीपूर्वी पुन्हा राजकीय हिंसाचार; BNP पक्षाच्या युवा नेत्याची गोळ्या घालून हत्या 

बांग्लादेशचा हट्टीपणा सुरूच… T20 World Cup 2026 चे ठिकाण बदलण्यासाठी आयसीसीवर दबाव
3

बांग्लादेशचा हट्टीपणा सुरूच… T20 World Cup 2026 चे ठिकाण बदलण्यासाठी आयसीसीवर दबाव

Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड
4

Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.