Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रॅगनला झुकलेच पाहिजे; डॉ. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्यात सीमावादावर लवकरच होणार चर्चा

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकतेच आपल्या वक्तव्यातून असे संकेत दिले आहेत की, 'भारत आणि चीनने सीमावादावर अंतिम तोडगा काढण्यासाठी दुहेरी प्रयत्न करू.' चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनीदेखील नुकत्याच झालेल्या एससीओ परिषदेदरम्यान भारत चीन संबंध सुधारण्यासाठी चीन आणखी प्रयत्न करेल असे म्हटले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 13, 2024 | 11:26 AM
डॉ. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्यात सीमावादावर लवकरच होणार चर्चा

डॉ. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्यात सीमावादावर लवकरच होणार चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील आंतरराष्ट्रीय बॉर्डरवर गेल्या चार वर्षांपासून तणाव सुरू आहे. बॉर्डरवर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. परंतु आता लवकरच दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित होईल असे दिसते आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात लवकरच सीमा वादावर चर्चा होणार आहे. या चर्चेचा मुख्य हेतू हा वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) शांतता प्रस्थापित करणे असा आहे. एप्रिल 2020 साली भारत चीन सीमेवर झालेल्या गलवान व्हॅली संघर्षाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा प्रयत्न करण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही नुकतेच आपल्या वक्तव्यातून असे संकेत दिले आहेत. भारत आणि चीनने अंतिम तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न करण्याचे मान्य केले आहे. LAC चा आदर करणे आणि सीमेवर शांतता प्रस्थापित करणे हे दोन्ही देशांसाठी फार महत्त्वाचे आहे. समान आदर, संवेदनशीलता आणि समान हितसंबंध यामुळेच दोन्ही देशातील संबंध चांगले होऊ शकतात.

SCO परिषदेत चीनचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले होते की, भारत आणि चीन हे जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले विकसनशील देश आणि मोठ्या अर्थव्यवस्था असलेले देश आहेत. भारत आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांच्या बॉर्डर ओलांडतात आणि त्यांच्यातील संबंध सुधारण्याची गरज आहे. कझाकस्तानमधील एससीओ परिषदेच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतल्यानंतर वांग यांनी असे वक्तव्य केले आहे. दोन्ही पक्षांनी संबंध चांगले करण्यासाठी संवादही वाढवला पाहिजे. आणि मिळून पुढे जाण्यासाठी सकारात्मक देवाण घेवाण केलं पाहिजे. आणि सीमेवरील परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी प्रयत्न केले पाहिजेत.

भारताचा प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी असे सांगितले होते की, ‘ आम्ही भारत चीन सीमावाद यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू.’ भारत आणि चीन चे संबंध आणखी सुधारण्यासाठी भारतानेही सकारात्मक भूमिका दाखवली आहे. तरीही भारताने सीमेवर सुरक्षा व्यवस्था भक्कम ठेवली आहे. जेणेकरून कोणत्याही देशाने हल्ला केल्यास भारताला सजग राहता येईल आणि प्रतिउत्तर देता येईल.

चीनचा भारतावर आरोप

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यांनतर चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्रात ‘भारत चीन संबंध’ यावर एक लेख लिहला होता. त्यात असे लिहले होते की, ‘ LAC वाद काही नवीन नाही तो कित्येक दशकांपासून अस्तित्त्वात आहे’ तसेच चीनची बाजू मांडताना पुढे असे लिहले आहे की,’ गेल्या काही वर्षात भारताने देशांतर्गत धोरणांमध्ये अनेक चीन विरोधी गोष्टी केल्या आहेत. ज्यात चिनी कंपन्यांवर बहिष्कार टाकणे, चीनच्या वस्तू आणि गोष्टी न वापरणे या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे ग्लोबल टाईम्सने भारताचे चीनसोबत संबंध बिघडण्यासाठी भारतालाच जबाबदार ठरवले होते.

 

 

 

Web Title: Dr jaishankar and chinas foreign minister will talk on border issues soon nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2024 | 11:26 AM

Topics:  

  • India China border relations
  • LAC India China
  • narendra modi

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
3

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
4

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.