लेखिका तस्लिमा नसरीन यांची बांग्लादेशातवर पोस्ट
ढाका: बांग्लादेशात आरक्षणाविरोधात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी( दि. ५ ऑगस्ट) आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्याला बांग्लादेशात सोडावे लागले. नुकतेच प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यांना 1994 मध्ये त्यांच्या लढ्ढा या पुस्तकावरून कट्टरवादी गटांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्यांना बांगलादेश सोडण्यास भाग पाडले गेले. त्यांनतर अजूनही त्यांना मायदेशी परतता आले नाही. यासंदर्भात त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यांचे विमान भारतातील गाझियाबाद येथील हिंडन तळावर उतरले. त्यांनी आता ब्रिटनकडे आश्रय मागितला आहे. ब्रिटनची परवानगी मिळेपर्यंत शेख हसीना भारतात तात्पुरता मुक्काम करणार आहेत. बांग्लादेशात अजूनही हिंसाचार सुरूच आहे. मात्र लष्कराने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. अंतरिम सरकार स्थापन करण्याचा दावाही केला.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांग्लादेश सोडल्यानंतर निर्वासित लेखिका तस्लिमा नसरीन यांनी टोला लगावला आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये तस्लिमा नसरीन यांनी लिहिले की, 1999 मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी इस्लामवाद्यांना खूश करण्यासाठी मला देशातून हाकलून दिले होते. आज त्याच इस्लामवाद्यांनी त्यांना देश सोडण्यास भाग पाडले आहे.
Hasina in order to please Islamists threw me out of my country in 1999 after I entered Bangladesh to see my mother in her deathbed and never allowed me to enter the country again. The same Islamists have been in the student movement who forced Hasina to leave the country today.
— taslima nasreen (@taslimanasreen) August 5, 2024
नसरीनने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा मी 1999 मध्ये माझ्या मरणासन्न आईला पाहण्यासाठी बांग्लादेशात परतले तेव्हा हसीनाने मला देशातून हाकलून दिले आणि पुन्हा न परतण्यास सांगितले. जेणेकरून मुस्लिमांना खूश करता येईल. आता तेच इस्लामी विद्यार्थी त्या चळवळीचा भाग होते. ज्यामुळे त्यांनी देश सोडला.’
Hasina had to resign and leave the country. She was responsible for her situation. She made Islamists to grow. She allowed her people to involve in corruption. Now Bangladesh must not become like Pakistan. Army must not rule.Political parties should bring democracy & secularism.
— taslima nasreen (@taslimanasreen) August 5, 2024
हसीनाला राजीनामा देऊन देश सोडावा लागला, असेही नसरीनने लिहिले आहे. तिच्या या परिस्थितीला ती स्वतःच जबाबदार आहे. त्यांनी इस्लामवाद्यांची भरभराट होऊ दिली. त्यांनी आपल्या लोकांना भ्रष्टाचार करू दिला. आता बांगलादेश पाकिस्तानसारखा होऊ नये. बांग्लादेशात लष्करी राजवट नसावी. राजकीय पक्षांनी तेथे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता आणली पाहिजे. लेखिका तस्लिमा नसरीन यांना 1994 मध्ये त्यांच्या लढ्ढा या पुस्तकावरून कट्टरवादी गटांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्यांना बांगलादेश सोडण्यास भाग पाडले गेले. खालिदा झिया त्या वेळी बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. तेव्हापासून तस्लिमा वनवासात आहेत.
बांग्लादेशात आरक्षणाविरोधात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्याला बांग्लादेश सोडावे लागले. त्यांचे विमान भारतातील गाझियाबाद येथील हिंडन तळावर उतरले. त्याने ब्रिटनकडे आश्रय मागितला आहे. ब्रिटनची परवानगी मिळेपर्यंत शेख हसीना भारतात तात्पुरती मुक्काम करणार आहेत. बांगलादेशात हिंसाचार सुरूच आहे. मात्र लष्कराने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. अंतरिम सरकार स्थापन करण्याचा दावाही केला.