Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहशतवादापासून ते सीमेवरील शांततेपर्यंत… India-China मध्ये ‘हे’ महत्वाचे करार, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

PM Modi-Xi Jinping Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दहशतवाद, सीमा तणावातील शांतता आणि व्यापार यासह विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 31, 2025 | 10:00 PM
india china dialogue new chapter key agreements security border stability

india china dialogue new chapter key agreements security border stability

Follow Us
Close
Follow Us:

India China relations : चीनच्या तियानजिन शहरात रविवारी (३१ ऑगस्ट २०२५) झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडली. या भेटीकडे जगाचे लक्ष लागले होते, कारण गेल्या काही वर्षांपासून भारत-चीन संबंधांमध्ये अनेक तणाव आणि वादळे पाहायला मिळाली होती. तथापि, या संवादातून दोन्ही देशांनी नवा सकारात्मक संदेश दिला आहे.

दहशतवादावर मोदींचा ठाम संदेश

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चेच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी सीमापार दहशतवादाचा मुद्दा ठामपणे उपस्थित केला. दहशतवाद ही केवळ भारताची समस्या नसून जागतिक शांततेला धोका आहे, हे मोदींनी स्पष्ट केले. “सीमेवर स्थिरता व शांतता राखणे हे द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी विम्यासारखे आहे,” असे मोदींनी जिनपिंगसमोर स्पष्ट केले. म्हणजेच, सीमेवरील अस्थिरता थेट भारत-चीन नात्यांवर परिणाम घडवते, हा सूचक संदेश मोदींनी दिला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Modi Cai Qi meeting : चीनमध्ये मोदींची ‘Cai Qi’ सोबत खास भेट; का मानली जातेय जिनपिंगपेक्षाही अधिक महत्त्वाची?

सीमेवरील सौहार्द हेच प्रगतीचे गमक

भारत-चीन संबंधांचा पाया सीमावर्ती भागातील शांतता आणि स्थिरतेवर अवलंबून आहे, हा मुद्दा मोदींनी पुन्हा अधोरेखित केला. “मतभेदांना वादात बदलू देऊ नका,” या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले. सीमावर्ती भागात सौहार्द टिकले, तरच व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासारख्या क्षेत्रात संबंधांची प्रगती शक्य आहे, असा सूर या भेटीत उमटला.

जिनपिंगच्या चार सूचना

या चर्चेदरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी चार ठोस सूचना मांडल्या. या सूचनांमध्ये विश्वास निर्माण करणे, संवाद वाढवणे, आर्थिक सहकार्याला चालना देणे आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी एकत्र काम करणे यांचा समावेश असल्याचे संकेत मिळाले आहेत. मोदींनी या सूचनांचे स्वागत करताना स्पष्ट केले की, स्थिर आणि सौहार्दपूर्ण भारत-चीन संबंध हे दोन्ही देशांच्या २.८ अब्ज लोकांच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी आणि जिनपिंग यांनी भविष्यातील द्विपक्षीय संबंधांसाठी त्यांच्या-त्यांच्या तत्त्वांची देवाणघेवाण केली. हे तत्त्व पुढील कामासाठी मार्गदर्शक ठरतील अशी अपेक्षा आहे. दीर्घकालीन विकास, परस्पर विश्वास आणि समन्वय यावर या चर्चेत भर देण्यात आला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : india china summit : पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्याबद्दल चिनी मीडियाने नक्की काय लिहिले? वाचा सविस्तर…

जागतिक मुद्द्यांवरही चर्चा

भारत आणि चीन हे जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे देश असल्याने जागतिक घडामोडींवर त्यांचा प्रभाव मोठा आहे. याच दृष्टीने मोदी-जिनपिंग बैठकीत अनेक जागतिक आव्हानांवर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती, वाढत्या टॅरिफ्स, तंत्रज्ञान क्षेत्रातील स्पर्धा, हवामान बदल यासारख्या मुद्द्यांवरही मतांची देवाणघेवाण झाली. दोन्ही नेत्यांनी मान्य केले की, बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत-चीन संबंध समजूतदारपणे पुढे नेणे अत्यावश्यक आहे.

नात्यांना नवा वेग?

गेल्या काही वर्षांत लडाखमधील सीमा वाद, व्यापारातील अडथळे, भू-राजकीय स्पर्धा यामुळे भारत-चीन नातेसंबंधांवर सावट होते. मात्र या भेटीने नवीन आशा निर्माण केली आहे. “संवाद, सौहार्द आणि सामायिक विकास” या तीन गोष्टी भविष्यातील मार्गदर्शक ठरू शकतात. दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्याला प्राधान्य द्यावे, अशी जागतिक अपेक्षा आहे.

मोदी-जिनपिंग बैठकीतून…

मोदी-जिनपिंग बैठकीतून स्पष्ट झाले की, भारत-चीन संबंधांची किल्ली सीमावर्ती शांततेत दडलेली आहे. दहशतवादासारख्या जागतिक आव्हानांवर एकत्रित लढा देणे आणि आर्थिक सहकार्य वाढवणे हेच दोन्ही देशांच्या प्रगतीचे भविष्य ठरवेल. ही भेट फक्त द्विपक्षीय संबंधांपुरती मर्यादित न राहता आशिया खंड आणि जागतिक राजकारणावरही दूरगामी परिणाम घडवू शकते.

Web Title: India china dialogue new chapter key agreements security border stability

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 10:00 PM

Topics:  

  • China
  • india
  • PM Narendra Modi
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ
1

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज
2

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख
3

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

बांगलादेशात नव्या पर्वाची सुरुवात! Tarique Rahman च्या शपथविधी सोहळ्याला भारत, पाकसह १३ देशांना आमंत्रण
4

बांगलादेशात नव्या पर्वाची सुरुवात! Tarique Rahman च्या शपथविधी सोहळ्याला भारत, पाकसह १३ देशांना आमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.