Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: काउंटडाउन सुरू! फक्त 7 दिवसांत भारत उचलणार पाकिस्तानविरोधात मोठे पाऊल

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अलीकडच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरुद्ध मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 25, 2025 | 11:03 AM
India may act against Pakistan in 7 days warns ex-Pak envoy Abdul Basit

India may act against Pakistan in 7 days warns ex-Pak envoy Abdul Basit

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अलीकडच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरुद्ध मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानचे भारत आणि जर्मनीतील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित अली यांनी स्वतः या संधीचा उल्लेख करत ‘उलटी गिनती सुरू आहे’, अशा शब्दांत पाकिस्तान सरकारला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

भारताची उग्र प्रतिक्रिया आणि नौदलाची ताकद

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने काही महत्त्वपूर्ण लष्करी हालचाली केल्या आहेत. विशेषतः भारतीय नौदलाने अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती वाढवली आहे, ज्यामुळे पाकिस्तान सरकारमध्ये खळबळ माजली आहे. अब्दुल बासित यांनी याच पार्श्वभूमीवर आपली चिंता व्यक्त करत भारताच्या पूर्व अनुभवांचा संदर्भ दिला आहे – जसे की २०१६ चा उरी हल्ला आणि २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेली सर्जिकल आणि एअर स्ट्राईक.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Persona Non Grata : भारताकडून पाकिस्तानला राजनैतिक झटका, पाक राजदूतांना ‘नॉन ग्राटा’ नोट

“भारत एका आठवड्यात मोठी कारवाई करू शकतो” – अब्दुल बासित

एक पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ ला दिलेल्या मुलाखतीत बासित म्हणाले की, “भारत सात दिवसांत पाकिस्तानविरुद्ध कठोर लष्करी कारवाई करू शकतो. ही कारवाई सीमावर्ती भागात असलेल्या दहशतवादी लाँच पॅड्सवर होऊ शकते.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील भाषणाचा संदर्भ घेत सांगितले की, “भारत काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत आहे.” ते पुढे म्हणाले, “सीमेपलीकडून अचानक हल्ला होऊ शकतो. भारत नंतर सांगेल की त्यांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे पाकिस्तानला कायद्याचे आणि अंतर्गत सुव्यवस्थेचे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.”

Breaking 🚨 Bharat 🇮🇳 Pakistan 🇵🇰 Big statement by former Pakistani High Commissioner Abdul Wasit India will conduct an Big airstrike in Balakot after a few days. pic.twitter.com/f4jea7iFda — Islamist Cannibal (@Raviagrawal300) April 24, 2025

credit : social media

सिंधू पाणी करार आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक

सिंधू पाणी कराराच्या संदर्भात बोलताना बासित म्हणाले की, “हा करार एकतर्फीपणे रद्द, निलंबित किंवा बदलता येत नाही. भारताने जर असे प्रयत्न केले, तर तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग ठरेल.” त्यांनी पाकिस्तान सरकारला जागतिक बँकेशी संपर्क साधण्याचा आणि एक सशक्त राजनैतिक प्रतिसाद तयार करण्याचा सल्ला दिला आहे, कारण जागतिक बँक हा या कराराचा मध्यस्थ आणि हमीदार आहे. बासित यांनी भारतावर आरोप करत सांगितले की, “भारत आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांचे पालन करत नाही आणि तरीही तो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान मिळवण्याचा दावा करतो. हे लोकशाही मूल्यांना धरून नाही.”

पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण

या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थितीची चर्चा रंगू लागली आहे. बलुचिस्तान आणि इतर भागांमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून, सरकारने त्वरित पावले उचलावी, असा सल्ला दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack: भारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास कोणता देश कोणाच्या बाजूने असेल?

भारताची संभाव्य कारवाई आणि पाकिस्तानचे अस्वस्थतेचे वातावरण

भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा तणावाच्या टोकावर आहेत. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत कठोर पावले उचलू शकतो, अशी शक्यता आता पाकिस्तानच्या वरिष्ठ मुत्सद्द्यांनीही मान्य केली आहे. सात दिवसांत काहीतरी मोठं होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्यामुळे पाकिस्तान सरकार आणि लष्कर सज्ज अवस्थेत आहेत. या सर्व घडामोडी याचे संकेत देतात की, भारत आपल्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही ढिलाई ठेवणार नाही आणि आवश्यक तेव्हा निर्णायक कृती करण्यास मागे हटणार नाही.

Web Title: India may act against pakistan in 7 days warns ex pak envoy abdul basit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • india pakistan war
  • jammu kashmir
  • Pahalgam Terror Attack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.