
फोटो सौजन्य AI
गृहमंत्री नकवी यांनी मागील २१ वर्षात देशातील जज , नोकरशहा आणि राजकारणी लोकांनी मिळून या देशाची वाट लावली आणि भ्रष्टाचारात सामील होण्याचे गंभीर आरोप देखील लावले . त्यांनी एक शपथ सुद्धा घेतली आहे कि , या भ्र्ष्टाचारात सहभागी असलेल्या प्रत्येकाला आपण जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही . राजकीय जाणकारांच्या मते असिफ मुनीर हे नकवी मार्फत देशात एक नवीन सरकार आणू पाहत असल्याचे बोलले जात आहे .
जाणकारांच्या मते मुनीर यांना मुशरफ सारखी एकहाती सत्त्ता आपल्या हातात घ्यायची आहे . आणि त्यासाठीच ते हा डाव टाकत आहेत . आणि त्यांच्या या डावानेच पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोघांची खुर्ची संकटात आली आहे . तसेच पाकिस्तान सैन्य प्रमुखाला संपूर्ण सत्तेचा मोह होणं हे काही पहिल्यांदा होत आहे , अश्यातला भाग नाही याआधी सुद्धा असे सैन्य प्रमुख सत्ता आपल्या हातात घेऊन देश चालवत असल्याचे जगाने पाहिले आहे . पाकिस्तान मध्ये लोकशाही ही फक्त दिखाव्यापुरती असल्याचे देखील बोलले जाते .
Pakistan News : PoK बंडावर झैद हमीदचा इशारा; भारत PoK ताब्यात घेणार?
मोहसीन नकवीच्या विधानानंतर खवळलेल्या पाकिस्तानच्या संरक्षक मंत्र्यांनी ख्वाजा असिफ यांनी , नकवी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे . त्यांनी पुढे सांगितले कि गेली ३ वर्ष झाले नकवी हे देशाच्या शक्तिशाली पदावर आहेत . त्यामुळे दे पंतप्रधानांनाही उत्तरदायी नाहीत . त्यामुळे जर एवढा ताकदवर मंत्री माणूस जर खंत व्यक्त करत असेल तर इतर मंत्र्यांनी आता सरळ घरीच गेले पाहिजे . असे व्यंगात्मतक उदगार त्यांनी काढले आहेत .ख्वाजा आसिफ यांनी मंत्रिमंडळ आणि संसदीय अधिवेशनांमधील नक्वी यांच्या मर्यादित सहभागावरही तीव्र टीका केली. नकवी केवळ दोन किंवा तीन मंत्रिमंडळ बैठकांना उपस्थित राहिले, असा दावा त्यांनी केला. आसिफ यांनी नकवी यांना सल्ला दिला की, त्यांनी स्वतःच्या गृह मंत्रालयात आणि पीसीबीमध्ये प्रणाली बदलण्यास सुरुवात करावी, कारण क्रिकेट चाहतेही त्यांच्या कामावर नाराज आहेत.