फोटो सौजन्य AI
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये, झैद हमीद यांनी आंदोलकांना घृणास्पद, लज्जास्पद आणि पूर्णपणे कृतघ्न संबोधून त्यांच्यावर शिवीगाळ केली आहे. हमीद यांचा दावा आहे की, जर ही आंदोलने थांबली नाहीत, तर भारतीय सैन्य त्या भागाचा ताबा घेईल. ते म्हणतात की, या परिस्थितीनंतरच तेथील लोकांना पाकिस्तानी सैन्याचे महत्त्व कळेल.
झैद हमीदने आंदोलकांवर आपला संताप व्यक्त केला आणि कठोर शिक्षेची मागणी केली. ऑडिओमध्ये तो असे बोलताना ऐकू आला की, या लोकांविरुद्ध बळाचा आणि कठोरतेचा वापर करणे आवश्यक आहे. तो म्हणाला की, आंदोलकांना हिंसेच्या माध्यमातून पाकिस्तान आणि त्याच्या सैन्याचा आदर करायला शिकवले पाहिजे. त्याच्या मते, या बेबंद आंदोलकांना फक्त भीती आणि दडपशाहीची भाषा समजते. यांच्यासोबत मवाळ भूमिका घेण्यात काहीच अर्थ नसल्याचे ही त्याचे मत आहे असे मिळालेल्या माहितीवरून समजते .
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये, झैद हमीद अमानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडताना आपल्याला ऐकू येतो . त्याने मागणी केली की पाकिस्तानी सैन्याने पाकव्याप्त काश्मीरला इस्रायल आणि गाझाच्या पातळीवर आणावे. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या आंदोलकांना देशद्रोही घोषित केले आहे. सरकारने हे स्पष्ट केले आहे की पाकिस्तानी लष्कराला विरोध करणाऱ्यांशी कोणतीही वाटाघाटी होणार नाही.
हमीद म्हणाले की, भारतीय लष्कराने रावलकोटसारख्या आंदोलनाच्या भागांवर नियंत्रण मिळवावे. भारतीय लष्कराने त्यांना योग्य धडा शिकवल्यानंतरच त्यांना त्यांच्या खऱ्या परिस्थितीची जाणीव होईल. त्यानंतर ते पुन्हा पाकिस्तानी लष्कराकडे मदतीसाठी आवाहन करतील. त्यांनी असा इशारा दिला की, पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागेल.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही आंदोलने संयुक्त आवामी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सातत्याने आयोजित केली जात आहेत. निर्वासितांसाठी राखीव जागा रद्द करणे आणि बेरोजगारी व महागाईला आळा घालणे, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. तसेच, काश्मिरींसाठी अधिक हक्क आणि न्याय्य आर्थिक धोरणांचीही त्यांची मागणी आहे. आतापर्यंत झालेल्या भीषण हिंसाचार आणि पोलीस गोळीबारात ३० जणांचा मृत्यू झाला आहे.






