Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 ‘रक्ताची शपथ आणि बलिदान…’ पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे पहलगामवर पहिलेच विधान

Shehbaz Sharif Pahalgam statement : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानला जबाबदार धरत बदला घेण्याची शपथ घेतली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 26, 2025 | 12:06 PM
'Blood oath and sacrifice...' Pakistani Prime Minister Shahbaz Sharif's first statement on Pahalgam

'Blood oath and sacrifice...' Pakistani Prime Minister Shahbaz Sharif's first statement on Pahalgam

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानला जबाबदार धरत बदला घेण्याची शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या देशाच्या सैन्याला उद्देशून कठोर भाष्य केले आहे. भारताच्या आरोपांना फेटाळून लावत त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान नेहमीच दहशतवादाचा निषेध करतो आणि त्याविरुद्ध लढताना असंख्य बलिदान दिले आहेत.

भारताच्या आरोपांवर शाहबाज शरीफ यांचे प्रत्युत्तर

शाहबाज शरीफ म्हणाले की, “पहलगाममध्ये जे काही घडले, ते केवळ आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” त्यांनी कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय चौकशीसाठी पाकिस्तान तयार असल्याचेही नमूद केले. पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध नेहमी कठोर भूमिका घेतली असून, जागतिक समुदायासमोरही त्याने आपल्या भूमिकेचे समर्थन केले असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, त्यांनी आपल्या भाषणात जोरदार इशारा दिला की, पाकिस्तानचे सैन्य युद्धासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास सक्षम आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Pakistan: ‘सिंधूमध्ये एकतर पाणी वाहील नाहीतर त्यांचे रक्त…’ पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टोंनी भारतविरोधात गरळ ओकली

“पाकिस्तानच्या प्रत्येक इंचाचे रक्षण करू”  ठाम भूमिका

शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात देशभक्तीचा सूर आळवत सांगितले की, “आम्ही पाकिस्तानच्या प्रत्येक इंच जमिनीचे रक्षण करू. शांतता आमच्यासाठी प्रथम आहे, मात्र कोणीही ती आमची कमजोरी समजू नये.” त्यांनी सैन्याच्या क्षमतेवर भर देत सांगितले की, कोणतीही आग्रही भूमिका किंवा आक्रमण सहन केले जाणार नाही. त्यांनी देशवासीयांना आश्वस्त केले की, “पाकिस्तान आपल्या सार्वभौमत्वासाठी शेवटच्या थेंबापर्यंत लढेल.”

सिंधू पाणी कराराबाबतही दिला इशारा

भारताने सिंधू पाणी करारावर पुनर्विचार करण्याच्या सूचनांवर प्रतिक्रिया देताना शाहबाज शरीफ यांनी चेतावणी दिली. त्यांनी ठामपणे सांगितले की, “जर पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्ही पूर्ण ताकदीने उत्तर देऊ.” सिंधू करार हा पाकिस्तानसाठी जीवनवाहिनी आहे, असे ते म्हणाले. त्यांनी भारताला आवाहन केले की, शांततेच्या मार्गावर राहावे, अन्यथा पाकिस्तानला आपल्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलावी लागतील.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतात संतापाचा सूर

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारतीय नेत्यांनी पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. भारताने जाहीर केले आहे की, या हल्ल्याचा बदला घेतला जाईल आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. भारताने पाकिस्तानवर दहशतवादाला पाठिंबा देण्याचा ठपका ठेवत, जागतिक व्यासपीठावरही या मुद्द्याला जोरदार उचलून धरले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांत तणावाची नवी लाट निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मोठी बातमी! बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर BLA चा हल्ला; १० सैनिक ठार

शाहबाज शरीफ

शाहबाज शरीफ यांचे कठोर वक्तव्य आणि भारताच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे दक्षिण आशियात पुन्हा एकदा संघर्षाचे ढग घोंगावत आहेत. शांततेच्या दिशेने वाटचाल होण्याऐवजी, दोन्ही बाजूंनी चकमकीच्या शक्यता वाढविल्या आहेत. पुढील काळात या वादाला कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pakistani prime minister shahbaz sharifs first statement on pahalgam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Pahalgam Terror Attack
  • Pakistan PM Shahbaz Sharif

संबंधित बातम्या

India-Pakistan Water Dispute: पाकिस्तानची तडफड! चिनाब नदीवर भारताचा ‘Dulhasti-2’ प्रकल्प; ट्रम्प राजवटीत नवा जागतिक पेच
1

India-Pakistan Water Dispute: पाकिस्तानची तडफड! चिनाब नदीवर भारताचा ‘Dulhasti-2’ प्रकल्प; ट्रम्प राजवटीत नवा जागतिक पेच

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी
2

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.