• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Bilawal Bhutto Threatens Indus Water Or Indian Blood

India-Pakistan: ‘सिंधूमध्ये एकतर पाणी वाहील नाहीतर त्यांचे रक्त…’ पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टोंनी भारतविरोधात गरळ ओकली

Bilawal Bhutto Indus threat : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 26, 2025 | 09:38 AM
Bilawal Bhutto threatens Indus water or Indian blood

'सिंधूमध्ये एकतर पाणी वाहणार नाहीतर त्यांचे रक्त...' पाकिस्तानी राजकारणी बिलावल भुट्टो यांची भारतविरोधात बेताल भाषा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Bilawal Bhutto Indus threat : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात सर्वात मोठा निर्णय म्हणजे सिंधू नदी कराराचा एकतर्फी स्थगिती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये मोठा खवळलेला सूर निर्माण झाला असून, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी चिथावणीखोर आणि बेताल वक्तव्ये करत भारताला थेट धमकी दिली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संतप्त भारताची निर्णायक कारवाई

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचे बळी गेले. दहशतवाद्यांनी हे पर्यटक त्यांच्या धर्मावरून ओळखून निवडकपणे ठार केले, ही बाब अतिशय संतापजनक आणि अमानवी आहे. या हल्ल्याला पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद कारणीभूत असल्याचे मानून भारत सरकारने तातडीने कठोर निर्णय घेतले. यामध्ये सिंधू पाणी करार थांबवणे, पाकिस्तानसोबतचे काही प्रकल्प स्थगित करणे यांचा समावेश आहे.

बिलावल भुट्टोंचे भडक विधान “सिंधूमध्ये रक्तही वाहू शकते”

या घडामोडींनंतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया येणे अपेक्षित होतेच, पण बिलावल भुट्टोंची भाषा अत्यंत आक्षेपार्ह ठरली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “भारताने सिंधू पाणी करार एकतर्फी थांबवला असून, त्यांनी स्पष्ट मान्य केले आहे की सिंधू आमची आहे. मी सुक्कुर येथे उभा राहून सांगतो की सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील – मग या सिंधूमध्ये पाणी वाहो वा रक्त.”

हे विधान केवळ भडकावणारे नसून द्वेषजन्य आणि युद्धाची भाषा बोलणारे आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारताने मात्र शांतपणे या वक्तव्याकडे दुर्लक्ष करत, आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘अमेरिकेचा पाठिंबा कुणाला? ‘ Tammy Bruce यांच्या उत्तराने पाकिस्तानच्या पत्रकाराची बोलतीच बंद

कालवा प्रकल्प थांबवण्याचा निर्णय आणि अंतर्गत पाकिस्तानी संघर्ष

सिंधू करारावर भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकिस्तान सरकारने पंजाब प्रांतातील वादग्रस्त चोलिस्तान कालवा प्रकल्प तात्पुरता थांबवला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन लष्करप्रमुख असीम मुनीर आणि मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी केले होते. मात्र, सिंध प्रांतातील जनतेने आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता, कारण सिंधमध्ये आधीच पाण्याची टंचाई आहे आणि या प्रकल्पामुळे ती आणखी गंभीर होणार आहे.

या प्रकरणामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत राजकीय व सामाजिक मतभेद उघड झाले आहेत. केंद्रातील पीएमएल-एन सरकार आणि पीपीपी यांच्यात तणाव निर्माण झाला असून, सिंध प्रांतातील आंदोलने उग्र रूप घेत आहेत.

“میں آپ سب کو مبارک باد پیش کرتا ہوں کہ جس مقصد کیلئے پاکستان پیپلز پارٹی کے کارکن احتجاج کررہے تھے، شاہراہوں سے لے کر ایوان تک کہ ہمیں سندھو پر نئی نہریں منظور نہیں ہیں۔ کل وزیر اعظم سے ملاقات میں یہ بات طے ہوچکی کہ آپ کی مرضی کے بغیر کوئی نئی نہر نہیں بنے گی۔ یہ پرامن جمہوری… pic.twitter.com/I8sF0IFLXh — PPP (@MediaCellPPP) April 25, 2025

credit : social media

भारताची भूमिका ठाम आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकृत

भारताने सिंधू पाणी कराराचा वापर राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक निर्णय म्हणून केला आहे. भारताने हे करारविषयक निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत घेतले असून, जागतिक समुदायही पाकिस्तानमधील वाढता दहशतवाद आणि भारताच्या संयमित पण कठोर प्रतिसादाची दखल घेत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर न्यू यॉर्क टाईम्सचा वादग्रस्त अहवाल; अमेरिकन समितीकडून तीव्र प्रतिक्रिया

 बिलावलचे विधान युद्धलालाचं प्रतीक, भारत शांत पण सज्ज

बिलावल भुट्टोंच्या ‘रक्ताच्या’ भाषेने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अजूनच मलीन झाली आहे. भारताने मात्र ठाम आणि शिस्तबद्ध धोरण राबवत, दहशतवादाला कोणतीही सहनशीलता न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधूवरून निर्माण झालेला हा संघर्ष केवळ जलनीतीचा नव्हे, तर राष्ट्रीय अस्मिता आणि सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे. पुढील काळात या संघर्षाचे आंतरराष्ट्रीय परिणामही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Bilawal bhutto threatens indus water or indian blood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 09:10 AM

Topics:  

  • india
  • pahalgam attack
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
1

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच
2

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर
3

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर

पाकडे सुधारणार नाहीच! हरीयाणामधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक; 3 वर्षांपूर्वीच युवक…
4

पाकडे सुधारणार नाहीच! हरीयाणामधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक; 3 वर्षांपूर्वीच युवक…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.