
आपल्यासाठी आताच्या पिढीला तंत्रज्ञान किंवा प्रगत उपकरणं किंवा वाहन रोजची गोष्ट वाटत असली तरी काही शंभर दीडशे वर्षांपूर्वी असं नव्हतं. कारला किंवा चारचाकीला लोक अगदी मोठ्या कुतूहलाने पाहायचे. अगदी टीव्ही आणि रेडियोची जशी एक वेगळीच आश्चर्याची क्रेझ लोकांना होती, तशीच कारगाडीचीही होती. घरी बैलगाडी असनाही मोठी श्रीमंतीची गोष्ट समजली जायची. घोडागाडी, टांगे यांचे युग तसे पाश्चिमात्य देशात संपतच आले होते. आणि जन्म घेतला होतं कारगाड्यांनी. मग इंग्रजांची सत्ता असतानाही कारला किंवा चारचाकीला तेवढंच ऐश्वर्याच प्रतिक म्हणून लोक बघत होते.
मग या गोष्टीचं कुतूहल निर्माण होतं कि महाराष्ट्र पहिल्यांदा कार कोणी आणली असेल बर? कोण असेल ते नशीबवान कुटुंब? आणि कोण असतील ती महाराष्ट्रात राहणारी लोकं ज्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात कार घेऊन आणि चालवून मानाचा तुरा आपल्या फेट्यात रोवला. चला तर पाहूयात.
महाराष्ट्रातील पहिली कार
तर १८९८ मध्ये मुंबईत एकूण चार कार आल्या होत्या. Curved Dash Oldsmobile ही ती कार होती. त्यापैकी महाराष्ट्रात राहणारे मोठे उद्योगपती जमशेदजी टाटा यांनी यापैकी एक कार घेऊन महाराष्ट्राची पहिली कार घरी आणली. महाराष्ट्रातल्या बरोबरच ते भारतातीलही कार आणणारे पहिले व्यक्ती ठरले. यापूर्वीही १८९७ मध्ये मिस्टर फॉस्टर यांनी मुंबईमध्ये स्वतःची कार आणली होती; पण ते ब्रिटीश नागरिक होते.
महाराष्ट्रातील पहिल्या महिला चालक
जमशेदजीनी भारतातली आणि महाराष्ट्रातलीही पहिली कार आणलीच, पण स्वतःबरोबर आपल्या घराच्या स्त्रियांनाही ती कार चालवण्याचा अवसर देऊन इतिहासच घडवला. १९०५ मध्ये जमशेदजी टाटा यांच्या सून सुझान टाटा (ज्या रतनजी टाटा यांच्या फ्रेंच पत्नी आणि जे.आर.डी टाटा यांच्या आई होत्या) यांनी मुंबईत पहिली कार चालवून इतिहास घडवला. त्या भारतातील आणि महाराष्ट्रातील कार चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
मुंबईमध्ये कार चालवतानाच्या काही रंजक गोष्टी
मुंबईच्या रस्त्यावर त्या काळात कार ताशी ५ ते ६ किलोमीटर वेगाने चालवली जात असे. रहिवाशांना आणि पादचाऱ्यांना सावध करण्यासाठी कारच्या ५ मिनिटे आधी हातात घंटा घेऊन एक व्यक्ती चालत असे.
महाराष्ट्रात तयार झालेली पहिली कार
जर आपण “महाराष्ट्रात बनवलेल्या पहिल्या कारबद्दल” बोलत असू, तर अनेक दशके भारतातील रस्त्यांची ओळख बनलेली ‘एम्बेसडर‘ (Ambassador) ही कार होती, जी १९५७ मध्ये हिंदुस्तान मोटर्सने लॉन्च केली. ही कार पूर्णपणे महारष्ट्रात बनली होती, हिचे सगळे पार्टसही महाराष्ट्रात बनले होते.