Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी आंदोलन, हमीभावाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक; सरकारला धरले धारेवर!

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून, आज काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय कृषिमंत्री यांच्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. ज्यामुळे संसदेत आज काही काळ गदारोळ पाहायला मिळाला.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 01, 2024 | 05:18 PM
शेतकरी आंदोलन, हमीभावाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक; सरकारला धरले धारेवर!

शेतकरी आंदोलन, हमीभावाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक; सरकारला धरले धारेवर!

Follow Us
Close
Follow Us:

सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु असून, आज संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्यात शेतकरी आंदोलन आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलन आणि पिकांच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. तर त्यास प्रतिउत्तर करताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तिखट प्रतिक्रिया देत बीजेपी सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य हमीभाव देत आहे. मात्र, असे असूनही विरोधी पक्षातील नेते अपप्रचार करत आहे. असे म्हटले. ज्यामुळे संसदेचे वातावरण काही काळ चांगलेच तापले होते.

राहुल गांधी यांनी मांडलेले मुद्दे

काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज शेतकऱ्यांच्या मुद्दयावरून लोकसभेत चांगलाच आक्रमक पवित्रा घेत भाजप सरकारला धारेवर धरले. यामध्ये प्रामुख्याने फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहे. मात्र, अजूनही सरकारला शेतकर्यांकडे पाहायला वेळ नाही. याउलट दिल्लीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्ग आजही बंद आहेत. याशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना आतंकवादी अशी उपाधी दिल्याचा देखील राहुल गांधी यांनी खरपूस समाचार घेतला.

इतकेच नाही तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, “देशातील उद्योगपतींचे अब्जावधींचे कर्ज माफ केले जाते. मात्र, देशभरातील जनतेला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर सरकारला दिसत नाही.” विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य दर मिळाला तर त्यांना कर्ज घेण्याची आणि सरकारी योजनांची गरजच पडणार नाही. असेही राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतील एका शेतकऱ्याचे वाक्य लोकसभेत नमूद करताना सांगितले. मात्र, असे असताना

कृषिमंत्र्यांची तिखट प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यांना प्रतिउत्तर देताना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत म्हटले आहे की, विरोधी पक्ष संसदेत चुकीची माहिती मांडत आहे. एनडीए सरकार देशातील शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव देत आहे. सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या उत्पादनाला खर्चावर ५० टक्के अधिक रकमेचा हमीभाव दिला जात आहे. सरकारने नुकतेच १४ पिकांचे हमीभाव वाढवले आहेत. मात्र, असे असूनही विरोधी पक्षनेते सभागृहाची दिशाभूल करत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Farmers agitation rahul gandhi aggressive in lok sabha on guarantee price issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2024 | 05:12 PM

Topics:  

  • Parliament session
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
1

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
2

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक
4

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.