Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा 30 वा दीक्षांत समारंभ संपन्न

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभात 1.39 लाख विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिक्षणाच्या संधी वाढवण्याचे आवाहन केले

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 24, 2025 | 09:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबवावेत, तसेच आर्थिक दुर्बल घटकातील तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक कोळसकर, कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आदी उपस्थित होते.

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये बालभवनसारखी केंद्रे उभारण्याचा प्रयत्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

राज्यपाल राधाकृष्णन यांनी कौशल्याधारित शिक्षणावर भर देत परदेशी भाषा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार विद्यापीठाने करावा, असे सुचवले. शिक्षण प्रणाली लवकरच परीक्षा केंद्रित मॉडेलऐवजी परिणाम आधारित मॉडेलकडे जाईल, यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि उद्योजक होण्यासाठी मदत होईल. 2036 पर्यंत उच्च शिक्षणात 50% नोंदणी साध्य करण्यासाठी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण महत्त्वाचे ठरेल. विद्यापीठ गृहिणी, कामगार, आदिवासी, बंदिजनांसाठी शिक्षण सुविधा उपलब्ध करून देत आहे. अभ्यासक्रमात नवकल्पना समाविष्ट करून विद्यापीठाचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्याबाबत शासनाला सूचना करण्यात येतील, असे राज्यपालांनी सांगितले.

डॉ. कोळसकर यांनी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शिक्षणात मोठे बदल होत असल्याचे सांगितले. त्यांनी विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या वापरावर प्रकाश टाकला, ज्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक संधी निर्माण होत आहेत. डिजिटल शिक्षणामुळे भौगोलिक अडथळे दूर होत असून, कोणत्याही ठिकाणाहून उच्च शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे.

कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाच्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे आणि त्याद्वारे आदिवासी, ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत ज्ञान पोहोचविणे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या डिजिटल परिवर्तन उपक्रमामुळे भविष्यात 1 कोटीहून अधिक विद्यार्थी विद्याशाखांशी जोडले जातील, असेही ते म्हणाले.

यावेळी विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक विजेत्यांना सन्मानपूर्वक पदके प्रदान करण्यात आली. या समारंभात विद्यापीठाच्या 96 अभ्यासक्रमांतील एकूण 1,39,218 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 60 वर्षांवरील 195 विद्यार्थ्यांचा समावेश होता, ज्यांनी वयाची मर्यादा ओलांडून शिक्षण घेण्याचा ध्यास कायम ठेवला. याशिवाय, विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 33 बंदिजनांनी शिक्षण पूर्ण करून पदवी मिळवली, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.

शैक्षणिक क्षेत्रात कामाची संधी; Non Teaching पदांसाठी होणार नियुक्ती, करा अर्ज

एकूण पदवी प्राप्त करणाऱ्यांमध्ये 15,370 पदविकाधारक, 91,197 पदवीधारक, 32,643 पदव्युत्तर पदवीधारक आणि 8 पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, यामध्ये 121 दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनीही आपल्या मेहनतीने यश संपादन केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांपर्यंत संधी उपलब्ध करून देण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांचे हे यशस्वी उदाहरण ठरले.

Web Title: 30th convocation ceremony of yashwantrao chavan open university concluded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 09:28 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर
1

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश
2

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू
3

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी
4

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.