Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान? ‘शाळा बंद’ आंदोलनामुळे राज्यातील तब्बल ८० हजार शाळांना कुलूप

राज्यात तब्बल ८० हजार शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून शिक्षकांनी पूर्वी नियुक्त झालेल्यांसाठी टीईटी सक्ती रद्द करण्याची ठाम मागणी केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 06, 2025 | 03:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • तब्बल ८० हजार शाळा बंद ठेवण्यात आल्या
  • विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान
  • शिक्षकांचा मुख्य आग्रह म्हणजे पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती रद्द करावी
राज्यभरातील प्रार्थमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण करणे सक्तीचे करण्यात आले होते. राज्य शिक्षण प्रशासनाचा हा निर्णय शिक्षकांना मान्य नव्हता कारण याने रुजू शिक्षकांची नोकरी जाण्याचीही मोठी संभाव्यता आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये आधीच तणावाचे वातावरण आहे. त्यांच्या या नाराजीने एका तीव्र आंदोलनाचे रूप घेतले आहे. शुक्रवारी या आंदोलनाचे परिणाम पाहण्याला मिळले आहेत. या दिवशी राज्यभरातील तब्बल ८० हजार शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे शाळा बंद आंदोलन मुंबई, पुणे, कोल्हापूर, जालना, परभणीसह विविध जिल्ह्यांत जिल्हाधिकारी कार्यालयांवर दिसून आले. मुळात, या आंदोलनात मोर्चे, घोषणा आणि निवेदन सादरीकरणाचा धडाका होता. (As many as 80,000 schools in the state have been closed due to the ‘Shala Band’ movement)

सूर्य कधी संपत नसतो! महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत पेटवणारे भाषण

‘शाळा बंद’ आंदोलन करण्या मागचा हेतू आणि मागणी काय?

शिक्षकांचा मुख्य आग्रह म्हणजे पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती रद्द करावी. कारण ते शिक्षकवर्ग आता अनुभवीही झाले आहेत. अशात या नवीन दडपणामुळे त्यांच्या नोकरीवर शासनाने टांगती तलवार ठेवली आहे. शिक्षकांच्या इतर मागणीमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भराव्यात, शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, तसेच सुधारित खात्रीशीर प्रगती योजना तातडीने अमलात आणावी तसेच जालन्यात टीईटी निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका तात्काळ दाखल करणे याचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र आणि जमर्नीतील ‘या’ राज्यामध्ये करार! परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

आता या मागण्या राजय शिक्षण मंडळाला मान्य आहेत का? त्यांचा यावर काय निर्णय आहे? या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मोर्चादरम्यान काही ठिकाणी पोलिसांसोबत धक्काबुक्कीही झाली. मुंबईतही पगार कपातीचा इशारा असतानाही सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटना एकजुटीने आंदोलनात उतरल्या. शिक्षक भारती संघटनेने सरकारला इशारा दिला की, मागण्या मान्य न झाल्यास नागपूर हिवाळी अधिवेशनात मोठं आंदोलन करण्यात येईल.

Web Title: As many as 80000 schools in the state have been closed due to the shala band movement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News
  • TET

संबंधित बातम्या

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात संविधान तसेच एड्स जनजागरण अभियान! स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
1

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात संविधान तसेच एड्स जनजागरण अभियान! स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

प्राध्यापक भरती निकषात बदल! शिक्षकांची नाराजी घेण्यात आली ध्यानात, ५०:५० सूत्र लागू होण्याची शक्यता
2

प्राध्यापक भरती निकषात बदल! शिक्षकांची नाराजी घेण्यात आली ध्यानात, ५०:५० सूत्र लागू होण्याची शक्यता

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही सरकारचे लक्ष! नेमण्यात आली समिती, करणार तणाव व्यवस्थापन
3

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही सरकारचे लक्ष! नेमण्यात आली समिती, करणार तणाव व्यवस्थापन

संदेश विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांचे ५० प्रकल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू
4

संदेश विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांचे ५० प्रकल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.