
chanakya niti
Chanakya Niti for Students: प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते की त्याने आपल्या अभ्यासात अव्वल यावे आणि समाजात उच्च स्थान प्राप्त करावे. परंतु, या पदापर्यंत पोहचण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे पुरेसे नाही, तर जीवनात शिस्त अंगिकारणे देखील महत्त्वाचे आहे. महान अर्थतज्ञ आणि मार्गदर्शक आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे सूत्र सांगितले आहेत चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
श्लोक: विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रताम l पात्रत्वाद्धनमाप्नोति धनाद्धर्मं तत: सुखम् ll
अर्थ – विद्या (ज्ञान) सर्वप्रथम माणसाला विनम्रता देते. ज्याच्या अंगी नम्रता असते, त्यांच्याकडे पात्रता आपोआप येते. पात्र आणि योग्य व्यक्तीच योग्य मार्गाने धन पैसा कमवू शकतो आणि त्या धनातून समाजकल्याणाची कामे करू शकतो. यातून आपल्याला ही शिकवण मिळते की, जर ज्ञान मिळाल्यानंतर तुमच्यात अहंकार येत असेल तर समजा तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहात.
आचार्य चाणाक्य यांनी विद्यार्थी जीवन यशस्वी करण्यासाठी पाच नियम सांगितले आहेत. जे प्रत्येक विद्यार्थ्यांने त्याच्या आचरणात आणले पाहिजेत.
श्लोक : काक चेष्टा बको ध्यानं श्वान निद्रा तथैव च। अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंच लक्षणम्॥
अर्थ – काक चेष्टा (कावळ्यासारखी उत्सुकता): ज्याप्रमाणे कावळा आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. त्याचप्रकारे विद्यार्थ्यांने जीवनात नेहमी नवीन शिकण्याची तीव्र इच्छा आणि निरंतर प्रयत्न करण्यासाची सवय अंगीकारायला हवी.
बको ध्यानं (बगळ्यासारखी एकाग्रता): अभ्यास करताना तुमचे लक्ष बगळ्यासारखे एकाग्र असले पाहिजे, जो पाण्यात अगदी शांत राहून केवळ आपल्या माशावर ध्येयावर लक्ष केंद्रीत करतो.
श्वान निद्रा (कुत्र्यासारखी सतर्कता): विद्यार्थ्यांची झोप ही अतिशय गाढ नसावी तर कुत्र्याप्रमाणे अगदी लहानशा आवाजानेही लगेच जागे होण्याची सतर्कता तुमच्याकडे असायला हवी, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही.
IIM Mumbai Jobs: आयआयएम मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज!
अल्पाहारी (संतुलित आहार): जास्त जेवल्याने शरीरात नेहमी आळस आणि सुस्ती येते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांने नेहमी संतुलित आणि गरजेनुसार जेवण केले पाहिजे.
गृहत्यागी (मोह मायेपासून दूर राहणे): येथे ‘गृहत्यागी’ याचा अर्थ हा घर सोडणे असा नाही तर अभ्यासाच्या काळात सुख-सुविधा आरामदायी आयुष्य आणि घरच्या मोह मायेपासून दूर राहून केवळ आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रीत करणे असा होते.