Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षण प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांचे आश्वासन; रिक्त पदेही भरणार

शासकीय विद्यानिकेतनमधील शिक्षक व शिक्षकेतर रिक्त पदांसह इतर प्रलंबित समस्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी दिले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 26, 2025 | 08:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • बैठकीत विद्यानिकेतनच्या सध्याच्या स्थितीचे सविस्तर मूल्यमापन
  • विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी दिला जाणारा आहार भत्ता वाढविण्याचा प्रस्तावही बैठकीत चर्चिला
  • बैठका आयोजित करण्याबाबतही सकारात्मक चर्चा
राज्यातील शासकीय विद्यानिकेतन शाळांमधील विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी शासन लवकरच ठोस पावले उचलणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी दिले आहे. राज्यातील या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदांची संख्या वाढत असून त्याचा परिणाम प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याने या भरती प्रक्रियेला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार मंत्रालयात देओल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या विशेष बैठकीत विद्यानिकेतनच्या सध्याच्या स्थितीचे सविस्तर मूल्यमापन करण्यात आले. बैठकीत शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, परीक्षा परिषदेचे आयुक्त नंदकुमार बेडसे, सहसचिव मोईन ताशीलदार, उपसचिव समीर सावंत, सर्व विद्यानिकेतनचे प्राचार्य तसेच माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. १९६६-६७ मध्ये तत्कालीन मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शासकीय विद्यानिकेतन शाळांचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेचा सर्वांगीण विकास साधणे हे असून या संस्थांची ओळख आजही गुणवत्तापूर्ण निवासासह शिक्षण देणाऱ्या राज्यातील महत्त्वाच्या शाळांमध्ये होते.

IIT मुंबईचा ‘प्रोजेक्ट आऊटरीच’ पायलट प्रोजेक्ट सुरू! अनेक सोयी-सुविधांचे लाभ लक्षात घेऊन, उभारली जातेय लॅब

बैठकीत विद्यानिकेतनच्या निकडीच्या मुद्द्यांवर केंद्रित चर्चा झाली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक कामकाजावर ताण वाढत असल्याची बाब प्राचार्यांनी मांडली. यावर देओल यांनी ही पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी दिला जाणारा आहार भत्ता वाढविण्याचा प्रस्तावही बैठकीत चर्चिला गेला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा भत्ता नियमितपणे वाढवणे आवश्यक असल्याचे एकमत व्यक्त केले. शैक्षणिक गरजांच्या दृष्टीने विद्यानिकेतनमध्ये अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांना अधिक संधी देण्यासाठी सेमी-इंग्रजी माध्यम सुरू करण्याचाही प्रस्ताव पुढे आला.

शाळेच्या आणि वसतिगृहाच्या इमारतींच्या दुरुस्ती, पायाभूत सुविधा सुधारणा आणि विद्यार्थ्यांसाठीच्या मूलभूत साहित्याच्या उपलब्धतेसाठी (कॉट, कपाटे, गाद्या, बेंचेस इ.) निधीची तरतूद करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. हे साहित्य ठराविक कालावधीनंतर बदलणे आवश्यक असल्याने यासाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच विद्यानिकेतनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांच्या उत्पन्न मर्यादेचे निकष वाढविण्याची शिफारसही करण्यात आली. बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी हा बदल उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त झाले.

पाचव्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींची अभिमानास्पद कामगिरी! पटकावले सुवर्ण पदक

याशिवाय, शाळेच्या संचालनासाठी वापरले जाणारे परिचय पुस्तिका (हँडबुक) अद्ययावत करणे, तसेच नियामक मंडळात आवश्यक त्या सुधारणा करून नियमित बैठका आयोजित करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी हे बदल महत्त्वाचे ठरणार असल्याचे देओल यांनी सांगितले. एकूणच शासन विद्यानिकेतनला आधुनिक, सक्षम आणि गुणवत्तापूर्ण बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.

Web Title: Education principal secretary ranjit singh deol assures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:27 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

भारतीय वायू दलात नोकरीची संधी! IAF कडून जाहीर करण्यात आली अधिसूचना; अग्निवीर भरती
1

भारतीय वायू दलात नोकरीची संधी! IAF कडून जाहीर करण्यात आली अधिसूचना; अग्निवीर भरती

Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन
2

Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन

शालांत परीक्षांचे ८,५०० केंद्र सज्ज! परीक्षक, साहित्य व मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ
3

शालांत परीक्षांचे ८,५०० केंद्र सज्ज! परीक्षक, साहित्य व मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ

Indian Insurance Institute: रिटायर्ड उमेदवारांसाठी संधी! भारतीय विमा संस्थांनामध्ये करा अर्ज
4

Indian Insurance Institute: रिटायर्ड उमेदवारांसाठी संधी! भारतीय विमा संस्थांनामध्ये करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.