Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझी भाषा माझी शाळा कार्यक्रमात मराठीकारणाची हाक! समाजाची ओळखही लोप पावत असल्याची चिंता व्यक्त

शाळा बंद पडल्याने केवळ शिक्षणच नव्हे, तर भाषा आणि समाजाची ओळखही लोप पावत असल्याची चिंता मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 24, 2026 | 08:09 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

शाळा बंद पडल्या की केवळ शिक्षणच नाही, तर भाषा आणि समाजाची ओळखही हळूहळू लोप पावते, असा इशारा सानेगुरुजींसारख्या द्रष्ट्या विचारवंतांनी अनेक दशकांपूर्वीच दिला होता. मात्र आजही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही, ही बाब चिंताजनक असल्याचे स्पष्ट मत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात शून्य शिक्षकी शाळांची संख्या वाढत असून मराठी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणावर बंद पडत आहेत. ही स्थिती मराठी भाषेच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

बी. डिझाईन सीईटीच्या प्रवेश नोंदणीस सुरुवात! अपार आयडी केले बंधनकारक

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठी अभ्यास केंद्र आणि सानेगुरुजी बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात ‘माझी भाषा, माझी शाळा’ या विचारमंथनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सानेगुरुजींच्या १२६ व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. दीपक पवार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. डॉ. पवार म्हणाले की, मराठी शाळा वाचविण्यासाठी केवळ भावनिक आवाहन नव्हे, तर नव्या पिढीला जोडणारे ठोस ‘मराठीकारण’ उभे राहणे अत्यावश्यक आहे. अन्यथा येत्या काळात महाराष्ट्रात अशी पिढी तयार होईल, जी मराठी भाषा नीट वाचू किंवा लिहू शकणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. यावेळी ‘बालविकास मंदिर’ मासिकाच्या ‘पूज्य सानेगुरुजी जयंती विशेषांकाचे’ प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमात मराठी भाषा, शाळा आणि संस्कृतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींची संख्या आज अत्यल्प असल्याचे वास्तवही अधोरेखित झाले.

Kolhapur News : दहावी, बारावी परीक्षेसाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीवर मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांची अदलाबदली होणार रद्द

मराठी समाजातील पालक मोठ्या प्रमाणावर आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दाखल करत असल्याने मराठी वाचन-संस्कृतीवर परिणाम होत आहे. मराठी पुस्तके वाचण्याची सवयच लोप पावत चालल्याचे चित्र असून, पुस्तकविक्रीच्या दुकानांमध्ये इंग्रजी पुस्तके ठळकपणे दिसतात, तर मराठी पुस्तके कोपऱ्यात लपलेली आढळतात, ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाब असल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले. सानेगुरुजींच्या विचारांवर भाष्य करताना डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या संतपरंपरेत सानेगुरुजी हे लौकिक अर्थाने संत नसले, तरी त्यांची वृत्ती संतसमान होती. प्रेम, माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश त्यांनी आपल्या विचारांतून दिला. ‘माणसाने माणसावर प्रेम करावे, हाच खरा धर्म’ हा विचार आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे महात्मा गांधी आणि सानेगुरुजींसारख्या व्यक्तींचे विचार केवळ स्मरणात न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: In the my language my school program a call was made for the promotion of the marathi language

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • Career
  • Marathi School

संबंधित बातम्या

Vasai Tatli Andolan : ‘ताटली’ आंदोलनाला यश! शासनाने घेतली दखल; जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार पुन्हा सुरू
1

Vasai Tatli Andolan : ‘ताटली’ आंदोलनाला यश! शासनाने घेतली दखल; जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार पुन्हा सुरू

Google top employer: भारतात ‘ही’ कंपनी ठरली सर्वात आकर्षक नियोक्ता; टाटा आणि ॲमेझॉनला कोणते स्थान मिळाले? जाणून घ्या..
2

Google top employer: भारतात ‘ही’ कंपनी ठरली सर्वात आकर्षक नियोक्ता; टाटा आणि ॲमेझॉनला कोणते स्थान मिळाले? जाणून घ्या..

Best Career Options : बारावीनंतर सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे उत्तम पर्याय; वाचा एका क्लिकवर..
3

Best Career Options : बारावीनंतर सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे उत्तम पर्याय; वाचा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.