Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकल महिलेच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती! पालक गमावलेल्या मुलांनाही मिळणार फायदा

राज्यातील एकल महिलांच्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी सरकार दरमहा ₹2,250 शिष्यवृत्ती देते, तर कोरोनात पालक गमावलेल्या मुलांना ₹4,000 मिळतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 03, 2025 | 06:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • मुलांच्या मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकासालाही हातभार
  • एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक मुलांना देखील
  • शिक्षणाला चालना देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची
राज्यातील एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक आणि आर्थिक आधार मिळावा, त्यांच्या संगोपनात कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना’ राबवली जात आहे. आई किंवा वडील गमावलेली मुले, अनाथ, निराश्रित, बेघर किंवा आपत्तीग्रस्त बालकांवर अचानक ओढवलेल्या जबाबदाऱ्या पाहता त्यांना योग्य संरक्षण आणि शिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अनेक वेळा अशा मुलांना संस्थांमध्ये राहावं लागतं; मात्र या योजनेंतर्गत मुलांचे संगोपन त्यांच्या स्वतःच्या घरात, कुटुंबाच्या सुरक्षित आणि परिचित वातावरणात व्हावे, हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुलांच्या मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकासालाही हातभार लागतो.

अमेरिकन विद्यापीठातून शिक्षण घेणे का फायद्याचे? जगाला दिशा देण्यासाठी उच्च शिक्षणपद्धत!

या योजनेअंतर्गत पात्र मुलांना दरमहा ₹2,250 शिष्यवृत्ती दिली जाते. ही रक्कम मुलांच्या शिक्षण, पोषण, आरोग्य आणि दैनंदिन खर्चासाठी मोठा आधार ठरते. २ ते १८ वर्षे वयोगटातील सर्व मुले या योजनेसाठी अर्ज करू शकतात. विशेष बाब म्हणजे, एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक मुलांना देखील ही शिष्यवृत्ती मिळू शकते. सरकारने या योजनेंतर्गत लाभ विस्तृत प्रमाणात पोहोचावा म्हणून कोणतीही संख्या मर्यादा ठेवलेली नाही.

कोविड-१९ महामारीच्या काळात अनेक मुलांनी आई-वडील किंवा पालक गमावले. अशा बालकांबाबत सरकारने अधिक संवेदनशील भूमिका घेत उत्पन्नाची अट पूर्णपणे रद्द केली आहे. यामुळे महामारीग्रस्त कुटुंबातील मुलांना दरमहा ₹4,000 इतकी विशेष आर्थिक मदत दिली जाते. ही मदत मुलांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधारकार्ड, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास), रहिवासी दाखला, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि अंगणवाडी सेविकेसह काढलेले छायाचित्र यांचा समावेश आहे. शाळेमार्फत पात्र मुलांची माहिती गोळा करण्यात येत असून शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांनी वेळेत आवश्यक प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे मुलांना शिष्यवृत्ती मिळण्यात विलंब होत नाही.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे शासकीय यंत्रणेद्वारे पार पडते. प्रथम संपूर्ण प्रस्ताव जिल्हा बालकल्याण समितीकडे सादर केला जातो. समिती प्रत्यक्ष सुनावणी घेऊन दस्तऐवजांची पडताळणी करते आणि त्यानंतर अर्ज मंजूर केला जातो. अर्ज मंजूर झाल्यावर जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभार्थी मुलांच्या खात्यात जमा केली जाते. प्रक्रिया पारदर्शक व नियमितपणे राबवली जाते, जेणेकरून कोणत्याही मुलाला मदतीपासून वंचित राहावे लागू नये.

SBI मध्ये भरती… पैसे कमवा लाखात! वाचा माहिती, आताच करा अर्ज

मदत हवी असल्यास तालुका पातळीवरील पंचायत समितीतील बालसंरक्षण अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधता येईल. स्थानिक समित्या, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्तेही पालकांना मार्गदर्शन करत आहेत. समितीच्या मते, परिसरातील एक किंवा दोन पालक गमावलेल्या मुलांना या योजनेची माहिती देऊन अर्ज प्रक्रियेत मदत करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. योजनेचा प्रत्येक पात्र मुलापर्यंत लाभ पोहोचावा, हेच या योजनेचे खरे यश मानले जात आहे.

Web Title: Special scholarship for the education of children of single women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 06:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.