CRIME (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. हा प्रकरण ताज असतानाच आता भंडाऱ्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे. मुलीला सासरी सुखात ठेवायचं असेल तर, ५ लाखांचा हुंडा द्या, अन्यथा तुमच्या मुलीला घरी परत घेऊन जा. आणि पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार करू आमचे नक्षल्यांशी संबंध आहे. अशी धमकी देत नागपूरच्या सासरकडील मंडळींनी नवविवाहितेला लग्नाच्या अवघ्या 60 दिवसात अंगावरील कपड्यांसह घरातून हाकलून लावल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा संतापजनक प्रकार भंडारा येथील वैभवीसोबत घडला आहे.
पीएमपीतील प्रवासी महिलांकडील दागिने चोरणाऱ्याला अटक; २५ हजारांची सोनसाखळी जप्त
नेमकं काय प्रकार?
भंडाऱ्याची वैभवी हिचा विवाह 19 जानेवारी रोजी नागपूरच्या शांतीनगर येथील मुदलियार लेआऊटमधील अभिषेक उर्फ घुनेश्वर डेकाटे (28) याच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसांतच पती अभिषेक, सासरे राजेंद्र (55), सासू माधुरी (49) आणि नणंद नंदिनी (23) यांनी वैभवीवर 5 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तगादा सुरू केला. हुंड्यासाठी तिचा सतत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. एवढाच नाही तर हुंडा न मिळाल्यामुळे वैभवीला 20 मार्चला सासरून अंगावरील कपड्यांसह घराबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूरला गेले असता, सासरच्यांनी “5 लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या मुलीला घेऊन जा” असं स्पष्ट सांगितलं. एवढ्यावरच न थांबता, “आमचे नक्षल्यांशी संबंध आहेत, पोलिसात गेला तर तुमच्या कुटुंबाला ठार करू” अशीही धमकी दिली गेली.
या सगळ्या प्रकारानंतर वैभवीचे वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पती अभिषेक, सासू माधुरी, सासरे राजेंद्र आणि नणंद नंदिनी यांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. वैभविचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूर येथे सासरी गेले असता, त्यांना 5 लाख रुपये द्या, तरचं मुलगी नांदवू असे सांगतानाचं आमचे नक्षाल्यांशी संबंध असून पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबियांना ठार करू अशी, धमकी दिली. याप्रकरणी नवविवाहितेचे वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसात वैभवीच्या सासरकडील मंडळी विरोधात भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून वैभवीचे पती अभिषेक, सासरे राजेंद्र, सासू माधुरी आणि नणंद नंदिनी यांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
भंडाऱ्यात दोन भीषण अपघात; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू!