
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं घडलं पिडीतेसोबत?
४ जून २०२५ रोजी गोपी लक्ष्मीचं लग्न विनुकोंडा शहरातील रहिवासी असलेल्या कोटेश्वर राव याच्यासोबत झालं होत. गोपी लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार, लग्नाला केवळ दोन महिने झाल्यानंतर तिचा पती कोटेश्वर राव, मावशी शेषम्मा आणि मामा वेंकटेश्वरलू यांनी तिचा छळ करण्यात सुरुवात केली. ती म्हणाली, की तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार दबाव आणला.
लग्नाच्या वेळी पीडितेच्या आई- वडिलांनी त्यांची दोन एकर जमीन गहाण ठेवली होती आणि तिच्या लग्नात 12 लाख रुपये रोख आणि 25 तोळे सोने हुंडा दिला होता. तिचा पती तिच्या काळ्या रंगावरून तिचा अपमान करत होता, ती काळी असल्याने त्याला ती आवडत नव्हती. इतकेच नव्हे तर, तिच्या सासरचे लोक ती घरात आल्यापासून कुटुंबात अशुभ घटना घडत असल्याचं सतत म्हणत होते असे तिने तक्रारीत म्हंटले आहे.
धमकी दिली, नंतर फरार झाले
पुढे पीडितेने आरोप केला आहे की, तिच्या सासरच्या लोकांनी तिला राजकीय ओळखींबद्दल सांगून धमकावलं. जरी तिने पोलिसांकडे तक्रार केली तरी त्यातून काहीच होणार नाही असे सासरच्या लोकांनी धमकी दिली. १४ डिसेंबरला पीडित गोपी लक्षमीने सासरच्या घरासमोर धरणे आंदोलन सुरु केले. त्यावेळी, पती आणि सासरची इतर मंडळी घर सोडून फरार झालीत.
गुन्हा दाखल
पोलिसांनी याप्रकरणी सुनेचा हुंड्यासाठी छळ आणि तिला सासरी त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. पीडितेने काठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Ans: हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ आणि रंगावरून हिणवणे.
Ans: 4 जून रोजी विनुकोंडा येथील युवकासोबत विवाह झाला.
Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत.