Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच केजरीवालांना मोठा धक्का; चक्क परिवहनमंत्र्यांनी सोडला पक्ष

कैलाश गेहलोत यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्रच केजरीवाल यांना दिले आहे. यामध्ये 'जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 17, 2024 | 01:38 PM
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच केजरीवालांना मोठा धक्का

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच केजरीवालांना मोठा धक्का

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका सुरु आहेत. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले तर आता महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. असे असताना आता काही महिन्यांतच दिल्ली विधानसभा निवडणूकही घेतली जाणार आहे. या निवडणुकीपूर्वीच आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला. दिल्लीचे परिवहनमंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलाश गेहलोत यांनी ‘आप’च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

संबंधित बातम्या : संविधान बदलण्याची घोषणा भाजपला पडणार भारी? निवडणूक आयोगाकडे काँग्रेस नेत्यांची तक्रार

कैलाश गेहलोत यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्रच केजरीवाल यांना दिले आहे. यामध्ये ‘जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. राजीनाम्यात त्यांनी यमुना नदी साफसफाई आणि केजरीवाल यांच्या बंगल्याच्या बांधकामाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. गेहलोत म्हणाले की, ‘आम्ही गेल्या निवडणुकीत यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. पण आम्ही यमुना नदी स्वच्छ करू शकलो नाही’.

बंगल्याचाही होता उल्लेख

अरविंद केजरीवाल यांना त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, “नवीन बांगलासारखे अनेक लाजिरवाणे आणि विचित्र वाद आहेत. यावरून अनेकांमध्ये शंका निर्माण होत आहे. जर दिल्लीने आपला बराचसा वेळ केंद्राशी लढण्यात घालवला तर माझ्याकडे ‘आप’शी फारकत घेण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलो नाही : गेहलोत

या पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, ‘मी तुमच्यासोबत हेही सांगू इच्छितो की, आज पक्षासमोर गंभीर आव्हाने आहेत, त्याच मूल्यांच्या आव्हानांनी आम्हाला एकत्र आणले आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा जनतेला दिलेल्या वचनबद्धतेच्या पलीकडे गेल्या आहेत आणि अनेक आश्वासने अपूर्ण राहिली आहेत. ज्या यमुनाला आपण स्वच्छ नदी बनवण्याचे वचन दिले होते, पण ती कधीच करू शकलो नाही, ती आता पूर्वीपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे.

आम्ही केवळ आमच्या राजकीय अजेंडासाठीच लढतोय

कैलाश गेहलोत यांनी ‘आप’वर मोठा आरोप करत म्हटले की, ‘आणखी एक क्लेशदायक गोष्ट म्हणजे लोकांच्या हक्कांसाठी लढण्याऐवजी आम्ही केवळ आमच्या राजकीय अजेंडासाठीच लढत आहोत. त्यामुळे येथील जनतेला मूलभूत सेवाही देणे कठीण झाले आहे. दिल्लीच्या जनतेची सेवा करण्याच्या वचनबद्धतेने मी माझा राजकीय प्रवास सुरू केला आहे आणि मला असेच चालू ठेवायचे आहे, म्हणूनच माझ्याकडे कोणत्याही पक्षाशी फारकत घेण्याचा पर्याय नाही आणि मी प्राथमिक पदाचा राजीनामा देत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या : ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय! शरद पवार यांचे महायुतीवर ताशेरे ओढणारे खुलं पत्र

Web Title: Kailash gehlot left aam aadmi party nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 01:38 PM

Topics:  

  • Aam Aadmi Party
  • political news

संबंधित बातम्या

‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला’; जयंत पाटील यांचे विधान
1

‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला’; जयंत पाटील यांचे विधान

‘गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी…’; संजय राऊत यांचे टीकास्त्र
2

‘गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी…’; संजय राऊत यांचे टीकास्त्र

विदर्भात वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार; जागावाटपावर चर्चांमधून तोडगा नाहीच
3

विदर्भात वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार; जागावाटपावर चर्चांमधून तोडगा नाहीच

BMC Election : भाजप-सेनेचे अखेर ठरलं ! जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत, भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार
4

BMC Election : भाजप-सेनेचे अखेर ठरलं ! जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत, भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.