Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Elections : “50 टक्के लाडक्या बहिणींना पैसेच मिळणार नाहीत…”; नाना पटोले यांचा मोठा दावा

विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती लागला आहे. मात्र यावरुन कॉंग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 29, 2024 | 02:26 PM
'मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं, हीच शिवसेनेची चूक; काँग्रेसकडून ठाकरे पुन्हा टार्गेट

'मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं, हीच शिवसेनेची चूक; काँग्रेसकडून ठाकरे पुन्हा टार्गेट

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विधानसभा निव़डणुकीचा एकतर्फी निकाल लागला आहे. यंदाची निवडणूक ही अटी तटीची होण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात महायुतीने विराट असे यश मिळवले. यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. अगदी विरोधी पक्षनेत्याच्या बाकावर बसण्यासाठी सुद्धा कोणत्याही पक्षाला दावा करता येणार नाही. या निकालावर कॉंग्रेसकडून सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले आहेत.

पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय घेतला आहे. नाना पटोले म्हणाले की, “देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा महत्त्वाचा अधिकार आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत केवळ दोन तासांत निकाल लावत आहे. आणि आमदार अपात्रेच्या सुनावणीसाठी वर्षानुवर्षे लावत आहेत. यावरुन ईव्हीएम मशीनबद्दलचे प्रेम लक्षात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आहे असा त्यांचा दावा तर तुम्हाला टक्केवारी जाहीर करण्यासाठी एवढी रात्र उशीर का लागला?” असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नाना पटोले पुढे म्हणाले की, “निकालाच्या दिवशी 11 वाजून 59 मिनिटांना तुम्ही मतदान किती झाले ते जाहीर करता. दुसऱ्या दिवशी तीन वाजता परत तुम्ही 1 टक्का वाढवता. 9 लाख मतं अचानक कशी वाढली. हे रात्री का नाही जाहीर केलं. दुसऱ्या दिवशी का केलं? यामध्ये पारदर्शकता कुठे राहिली? याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिली आहे. या संदर्भात आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देऊन अधिकृतपणे यावर चर्चा करुन आयोगाला भूमिका काय याची मागणी करणार आहोत. हा विषय गंभीर आहे,” असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

नाना पटोले म्हणाले की, “आम्ही हारले म्हणून असं करतोय असं विरोधक म्हणत आहेत. मात्र हा विषय खरोखरच गंभीर आहे. हारले म्हणून नाही..आमचं जरी सरकार येतं असतं आणि मतमोजणीमध्ये या प्रकारची तफावत असती तरी आम्ही हीच भूमिका घेतली असती. कारण देशामध्ये लोकशाही वाचली पाहिजे,” असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

“स्वातंत्र्याची लढाई आम्ही निस्वार्थीपणे लढली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा इतिहास सर्वांना माहिती आहे. पूर्वी जनतेच्या भीतीमुळे सरकारला काम करावं लागत होतं. मात्र आता सरकारच्या मनामध्ये जनतेची भीतीच राहिलेली नाही. महाराष्ट्रामध्ये निकाल लागून पाच ते सहा दिवस झाले. पण या दिवसांमध्ये सरकार स्थापन करण्यात आलेलं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच असून त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही. पीकांचे व बी बियाणांचे खरेदी केंद्र सुरु झालेली नाहीत. शेतकऱ्यांवर वाऱ्यावर सोडलं आहे. महागाई रोज वाढत आहे. आता यापुढे 50 टक्के लाडक्या बहिणींना पैसे दिले जाणार नाहीत,” असा घणाघात कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

Web Title: Congress leader nana patole serious criticism of the election commission over the voting percentage in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 02:26 PM

Topics:  

  • cm of maharashtra
  • Congress
  • maharashtra election 2024
  • Nana patole

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
3

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.