Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या प्रचारात प्रियांका गांधींची दमदार एन्ट्री; शिर्डीतील सभेतून महायुतीविरोधात फुंकले रणशिंग

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी एन्ट्री झाली आहे. शिर्डीमध्ये सभा घेऊन त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 16, 2024 | 03:39 PM
Congress Priyanka Gandhi Shirdi sabha marathi news

Congress Priyanka Gandhi Shirdi sabha marathi news

Follow Us
Follow Us:

शिर्डी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत होत आहे. महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारासाठी आता दिल्लीतील नेते सभा घेत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी या रिंगणात उतरल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिर्डीमध्ये प्रियांका गांधी यांची पहिली सभा पार पडली. पहिल्याच सभेमध्ये प्रियांका गांधींनी महायुतीचा खरपूस समाचार घेतला आहे.

काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

“महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सत्य, समानता आणि मानवता कणाकणांमध्ये भरली आहे. महाराष्ट्र हा नेहमी मार्गदर्शक राहिला आहे. धार्मिक कट्टरताचा विरोध आणि समानतेची मागणी हा महाराष्ट्राचा पुरोगामी विचार राहिला आहे. मागच्या दहा वर्षातील मोदींच्या आणि भाजपच्या सरकार काळामध्ये आणि महाराष्ट्रातील अडीच वर्षांतील महायुतीच्या सरकारमध्ये सत्य व खरेपणा याला काहीच किंमत राहिलेली नाही. देशाचे पंतप्रधान असो वा इतर मोठे नेते आहेत ते काहीही बोलायला लागले आहेत. त्यांना या गोष्टीची पर्वाच नाहीच की जे मी बोलत आहे त्याचा परिणाम काय होणार आहे? हे खरं आहे का? याने कोणाचं भलं होणार आहे का? असं या नेत्यांना वाटतंच नाही,” असे मत प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले आहे.

‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय! शरद पवार यांचे महायुतीवर ताशेरे मारणारे खुलं पत्र

पुढे त्या म्हणाल्या की, “संपूर्ण देशाचे गौरव असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. मतदारांचा अपमान केला जात आहे. शिवाजी महाराजांचे स्मारकाचे जलपूजन केले पण पुतळा बनवलाच नाही. संसदेच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकला. आणि सिंधुदुर्गमध्ये बांधलेला पुतळा नित्कृष्ट कामामुळे कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला जात आहे. तर मग प्रत्येक सभेला आणि मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यामध्ये अर्थ काय आहे?” असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला.

‘वोट-जिहाद’ चा मुकाबला करण्यासाठी…; महाराष्ट्रात ‘व्होट जिहाद’कोण करतंय? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

प्रियांका गांधी यांनी महायुतीच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की, “यांच्या सरकारच्या काळात दुधाला भाव नाही, पिकाला हमीभाव नाही, शेतकऱ्याला कर्जमाफी देखील दिली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की पैसे नाही म्हणून म्हणतात. मात्र मोठ्या उद्योगपतींचे 16 लाख करोड रुपये माफ केले आहेत. याचे उत्तर त्यांच्याकडे नाहीच. जिथे जिथे कॉंग्रेसचे राज्य आहे तिथे तिथे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. मोदीजी तेव्हा सरकार वेगळे होते, आज सरकार वेगळे आहे,” असा टोला प्रियांका गांधी यांनी भरसभेमध्ये लगावला आहे.

Web Title: Congress priyanka gandhi sabha in shirdi to campaign for maharashtra assembly elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 03:39 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Priyanka Gandhi

संबंधित बातम्या

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
2

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
3

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
4

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.