
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Gautami Kapoor Apology: नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘लॉक अप २’ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रत्येक भागात नवे वाद आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. रितेश देशमुख आणि फराह खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या ‘फॅमिली स्पेशल’ भागात असा एक प्रसंग घडला, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
या विशेष भागात स्पर्धकांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र शोमध्ये आले होते. अभिनेता राम कपूरला भेटण्यासाठी त्याची पत्नी आणि अभिनेत्री गौतमी कपूरही शोमध्ये पोहोचली. मात्र, पतीची भेट घेण्यापूर्वीच तिने सर्वांसमोर स्पर्धक श्रेया कालराची हात जोडून माफी मागितली.
गौतमी कपूर म्हणाली, “रामच्या वागण्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल, त्याने अयोग्यरित्या स्पर्श केला असेल किंवा वारंवार किस घेऊन तुला अस्वस्थ केलं असेल, तर मी त्याच्या वतीने तुझी माफी मागते.”
यानंतर तिने घरातील इतर महिला स्पर्धकांकडे वळूनही दिलगिरी व्यक्त केली. ती म्हणाली, “राममुळे कोणत्याही महिलेला अस्वस्थ वाटलं असेल, तर मी त्याच्या वतीने माफी मागते. मी त्याच्या वागण्याचं समर्थन करत नाही. पण तो स्वभावाने अगदी टेडी बेअरसारखा आहे.”
हा संपूर्ण वाद काही दिवसांपूर्वी सुरू झाला होता. शोदरम्यान श्रेया कालराने राम कपूरच्या वारंवार मिठी मारण्याच्या आणि कपाळावर तसेच गालावर किस घेण्याच्या सवयीमुळे आपण अस्वस्थ झाल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. तिने असेही म्हटले होते की, पुन्हा अशी वेळ आल्यास ती त्याला थेट थांबवेल.
याशिवाय, दुसरी स्पर्धक अपूर्वा मखिजा हिनेही राम कपूरच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या वारंवार किस करणाच्या कृतीमुळे तिला त्रास होत असल्याचे तिने सांगितले होते. या प्रकरणानंतर सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी या विषयावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, ‘लॉक अप २’चा ग्रँड फिनाले ५ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अंतिम फेरी जवळ येत असतानाच घरातील वाद अधिकच तीव्र झाले असून प्रेक्षकांमध्ये विजेता कोण ठरणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.