
18th Civil Services Day celebrated PM Modi and Vice President C.P. Radhakrishnan address
सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनानुसार, १९४७ साली याच दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखिल भारतीय प्रशासकीय सेवेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित करताना, सनदी अधिकाऱ्यांना भारताचा भक्कम पाया असे संबोधले होते. हा प्रसंग नागरिक-केंद्रित प्रशासनाप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करतो. तेव्हापासून दरवर्षी नागरी सेवा दिन साजरा केला जातो.
हे देखील वाचा : इराणला कमी लेखण्याची चूक भोवली! इराणसमोर अमेरिकेची प्रतिमा धुळीस, टीकेची झोड
१८ व्या नागरी सेवा दिनाचे आयोजन
नागरी सेवा दिन २०२६ ची संकल्पना “विकसित भारत: नागरिक-केंद्रित शासन आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास” ही आहे. ही संकल्पना ‘विकसित भारत २०४७’ च्या दूरदृष्टीशी सुसंगत असून, पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिक-केंद्रित शासनाप्रती सरकारची वचनबद्धता दर्शवते. यामध्ये सर्वसमावेशक विकास आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवांची उपलब्धता यावर भर दिला जातो. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयांतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग, मंगळवारी १८ व्या नागरी सेवा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : छत्तीसगडमधील जशपूरमध्ये विमान कोसळले; खासगी विमान डोंगरावर आदळले
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन देखील घेणार सहभाग
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन हे विज्ञान भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आणि कार्यक्रमाचे मुख्य भाषण देखील उपराष्ट्रपती देणार आहेत. उद्घाटन सत्रात केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचे भाषण आणि कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथन यांचे स्वागतपर भाषण यांचाही समावेश असेल. यानंतर “नागरी सेवांची भूमिका आणि परिणामकारकता: एक बाह्य दृष्टिकोन” या विषयावर पॅनल चर्चा होईल.