पुरी जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, ४० हून अधिक भाविक बेशुद्ध
ओडिशातील जगप्रसिद्ध श्रीजगन्नाथ रथ यात्रेतून धक्कादायक बातमी आहे. रथ यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी पुरी शहरात चेंगराचेंगरी झाली असून ६०० हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. श्रीनाहर, म्हणजेच गजपति राजाच्या महालाजवळ ही चेंगराचेंगरी झाली. शुक्रवारी सकाळी ‘पहाड़ी’ समारंभादरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या चेंगराचेंगरी जीवितहानी टळली आहे.
Ketu Gochar: शनि पुष्यामुळे ग्रहण योगाचे संयोजन, या राशीच्या लोकांच्या अडचणीत होऊ शकते वाढ
गजपति दिव्यसिंहदेव यांच्या महालाजवळ पहाड़ी सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी रथ यात्रेला सुरुवात झाल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि भाविकांनी एकमेकांना ढकलत धावाधाव सुरू केली. या गोंधळात अनेक जण बेशुद्ध पडले. गर्दी एवढी वाढली होती की, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला ती नियंत्रित करण्यात प्रचंड अडचणी येत होत्या.
#WATCH | Puri, Odisha | Ambulances reached the Rath Yatra spot after some people complained of suffocation and were reported unconscious due to humidity.
The affected people were taken to the hospital and were provided with the required medical assistance https://t.co/Fie3j5sA03 pic.twitter.com/JYIkSUi7jj
— ANI (@ANI) June 27, 2025
घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी भाविकांना त्वरीत पुरी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सर्वांचं उपचार सुरू आहेत. सीडीएमओ कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमी भाविकांची प्रकृती सध्या स्थिर असून आवश्यक उपचार पुरवण्यात येत आहेत.
गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये देखील रथ यात्रेदरम्यान अशीच चेंगराचेंगरी झाली होती. त्या वेळी अतिप्रचंड गर्दीत दम घुटल्यामुळे एका भाविकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त होतं. त्यामुळे यंदा प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही, पुन्हा एकदा मोठा अपघात टळला असला तरी भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Astrology: जुलै महिन्यात मोठ्या 6 ग्रहांचे होणार संक्रमण, या राशीच्या लोकांना मिळणार धन आणि संपत्ती
या वर्षी देखील पुरीच्या ग्रँड रोडवर लाखो भाविक जमले होते. बलभद्राच्या रथाला ओढताना रस्सीला स्पर्श करण्यासाठी हजारो लोक एकाच वेळी पुढे सरसावले. रथ गुंडिचा मंदिराकडे जात असताना, घटनास्थळापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर गर्दीने उधळपथ सुरू केली. यामुळे धक्का-बुक्की झाली, अनेक जण खाली पडले आणि काहींना दम घुटल्यासारखी स्थिती भासली.
जगन्नाथ रथ यात्रा ही ओडिशातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी रथ यात्रेच्या वेळी अशी घटना घडल्यामुळे भाविकांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. प्रशासनाने यावर अधिक परिणामकारक उपाययोजना करणे आता अनिवार्य ठरत आहे.