Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वक्फ कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद; कायद्यातील असंवैधानिक तरतुदींवर सविस्तर आक्षेप

मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद जमील मर्चंट यांनी वक्फ (सुधारणा) कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत हा कायदा मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 20, 2025 | 08:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

वक्फ (सुधारणा) कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद जमील मर्चंट यांनी हा कायदा मुस्लिम समाजाच्या मूलभूत हक्कांना धक्का देणारा आणि धार्मिक संस्थांचे अस्तित्व धोक्यात आणणारा असल्याचा ठपका ठेवला आहे. मर्चंट हे या प्रकरणातील पाच याचिकाकर्त्यांपैकी एक असून, त्यांनी न्यायालयात युक्तिवाद सादर केला.

Ambernath : अंबरनाथ पालिकेत भटके-विमुक्त बांधवांची धडक

मर्चंट यांनी सांगितले की, वक्फ सुधारणा कायद्यामुळे सरकारला वक्फ मालमत्तेवर अधिक नियंत्रण मिळते आणि धार्मिक संस्था, त्यांचे अधिकार व निधी यांच्यावर सरकारी हस्तक्षेप वाढतो. अशा हस्तक्षेपामुळे मुस्लिम समाजाचे सांस्कृतिक व धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्यामते, हा कायदा केवळ धार्मिक स्वातंत्र्यच नव्हे तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचेही उल्लंघन करतो.

याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील एजाज मकबूल यांनी सर्वोच्च न्यायालयात सविस्तर नोंद सादर करत या कायद्यातील असंवैधानिक तरतुदींवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, वक्फ मालमत्ता व धार्मिक संस्थांवरील सरकारी नियंत्रणामुळे मुस्लिम समाजाच्या ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे नुकसान होणार आहे. एप्रिल २०२४ मध्ये संसदेत वक्फ (सुधारणा) विधेयक मंजूर झाले होते, ज्याद्वारे वक्फ कायदा १९९५ मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘एकात्मिक व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा, २०२५’ (UMED कायदा) मंजूर केला, जो तातडीने लागू करण्यात आला.

Maharashtra Cabinet decision : राज्यात घर कुणा-कुणाला मिळणार? मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय

मकबूल यांनी सर्वोच्च न्यायालयात सात मुद्दे मांडले. त्यांच्या मते, हा कायदा प्रशासनाला मनमानी अधिकार देतो आणि शतकानुशतके चालत आलेल्या धार्मिक परंपरा, सांप्रदायिक सौहार्द यांना गंभीर धोका पोहोचवतो. हा कायदा भारतीय मुस्लीम समाजासाठी दीर्घकालीन नुकसानकारक ठरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. मर्चंट आणि इतर याचिकाकर्त्यांना न्यायपालिकेवर विश्वास असून, संविधानातील समानता आणि धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण न्यायालय नक्कीच करेल, असा त्यांचा विश्वास आहे.

Web Title: Arguments in supreme court against waqf act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • national news

संबंधित बातम्या

Modi Government: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून जीवनावश्यक वस्तू ३० जूनपर्यंत करमुक्त
1

Modi Government: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून जीवनावश्यक वस्तू ३० जूनपर्यंत करमुक्त

Maharashtra Breaking News Updates Today:  राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
2

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

India Census 2027: देशाच्या जनगणनेचे बिगुल वाजले! एप्रिल २०२६ पासून पहिल्या टप्प्याला सुरुवात
3

India Census 2027: देशाच्या जनगणनेचे बिगुल वाजले! एप्रिल २०२६ पासून पहिल्या टप्प्याला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.