Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aap MLA Meeting : दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी! अरविंद केजरीवालांनी बोलावली पंजाबचे मुख्यमंत्री आणि आमदारांची तातडीची बैठक

दिल्लीच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पंजाब सरकारमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 11, 2025 | 05:19 PM
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी! अरविंद केजरीवालांनी बोलावली पंजाबचे मुख्यमंत्री आणि आमदारांची तातडीची बैठक

दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी! अरविंद केजरीवालांनी बोलावली पंजाबचे मुख्यमंत्री आणि आमदारांची तातडीची बैठक

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पंजाब सरकारमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान भाजपमध्ये प्रवेश करणार असून लवकरच आपचं पंजाबमधील सरकार कोसळेल, असा दावा कॉंग्रेसच्या नेत्याने केला होता. त्यानंतर अरविंद केजरीवाल अलर्ट झाले असून आज त्यांनी भगवंत मान, सरकारी मंत्री आणि आमदारांची राजधानी दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे.

बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आपच्या आमदारांशी संवाद साधला. केजरीवाल यांनी संभाषणात आमदारांना काय सांगितलं याची माहिती अद्याप समजू शकली नाही. मात्र ज्या पद्धतीने घाईघाईत बैठक बोलावण्यात आली, त्यावरून निश्चित काहीतरी गंभीर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या हायकमांडचे इतर नेते चंदीगडला जाऊन बैठक घेऊ शकले असते, मात्र त्यांनी मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांसह सर्व आमदारांना दिल्लीला बोलावलं. दिल्ली निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला आहे. पक्षाच्या पराभवाबरोबरच या मोठ्या नेत्यांच्या पराभवामुळे हायकमांड कमकुवत झाला आहे. हायकमांड कमकुवत झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ नये म्हणून, निकाल लागल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या नेत्यांना लगेच फोन केला.

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आमदार आणि नेत्यांविरुद्ध सत्ताविरोधी लाट. दिल्ली निवडणुकीत ‘आप’ने मोठ्या संख्येने आमदारांची तिकिटे कापली. एवढंच नाही तर ज्या आमदारांची तिकीट कापली, त्यापैकी एक-दोन वगळता इतर सर्व आमदार भाजपमध्ये गेले. पंजाबमध्येही अनेक मुद्द्यांवर आमदारांमध्ये नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवणाऱ्या ‘आप’ला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फक्त ३ जागा जिंकता आल्या. डिसेंबर २०२४ मध्ये पंजाबमध्ये नगरपालिका निवडणुका झाल्या, जिथे ‘आप’ने ५ पैकी फक्त ३ महानगरपालिकांमध्ये विजय मिळवला. काँग्रेसने २ जागांवर विजय मिळवला होता.

दिल्लीत १९ जागांवर कॉंग्रेसच्या उमदेवाराला जितकी मतं मिळाली तेवढ्या मत फरकांनी आम आदमी पक्षाचे उमेदवार पराभूत झाले. या १९ जागांमध्ये अरविंद केजरीवाल यांची नवी दिल्ली आणि मनीष सिसोदिया यांच्या जंगपुरा जागेचाही समावेश आहे. आता ही भीती पंजाबमधील आम आदमी पक्षाला सतावत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची थेट स्पर्धा ‘आप’शी आहे. दुसरीकडे, शहरांमध्ये भाजपची मजबूत पकड आहे. २०२० च्या निवडणुकीत भाजपला पंजाबमध्ये ६.६ टक्के मते मिळाली. या निवडणुकीत ‘आप’ला ४२ टक्के आणि काँग्रेसला २३ टक्के मते मिळाली होती.

२०२२ मध्ये आम आदमी पक्ष सत्तेत आलेले पंजाब हे पहिले पूर्ण राज्य आहे. २०१३ मध्ये दिल्लीत आप सत्तेत आले, परंतु दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला नाही. पंजाबमधील विजयानंतर, ‘आप’च्या मोठ्या नेत्यांना व्यापक सुरक्षा मिळाली, तर पक्षाच्या विस्तार धोरणालाही चालना मिळाली. पंजाबमध्ये सत्तेत आल्यानंतर आपच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या ३ वरून १० झाली. त्याचप्रमाणे पंजाब जिंकल्यानंतर ‘आप’ गुजरातमध्ये पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरली. गुजरातमध्ये चांगल्या कामगिरीनंतरच ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. २०२७ मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. जर पंजाबचे निकाल दिल्लीसारखे असतील तर ‘आप’साठी पुढचा मार्ग सोपा असणार नाही, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

Web Title: Arvind kejriwal call urgent meeting with punjab cm bhagwant mann mla and minister in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 04:51 PM

Topics:  

  • Aam Aadami Party
  • Arvind kejriwal
  • Bhagwant Mann

संबंधित बातम्या

INDvsPAK : भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय गदारोळ! केजरीवाल म्हणाले- पाकिस्तानशी सामना हा देशाशी विश्वासघात…
1

INDvsPAK : भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय गदारोळ! केजरीवाल म्हणाले- पाकिस्तानशी सामना हा देशाशी विश्वासघात…

Punjab Floods: पंजाबमधील पुरामुळे भगवंत मान सरकारची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई
2

Punjab Floods: पंजाबमधील पुरामुळे भगवंत मान सरकारची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची तब्येत बिघडली; तात्काळ रूग्णालयात केले दाखल
3

मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची तब्येत बिघडली; तात्काळ रूग्णालयात केले दाखल

PM-CM हटवण्याच्या विधेयकावरून गदारोळ; अरविंद केजरीवालांनी अमित शहांना विचारले फक्त प्रश्न दोन
4

PM-CM हटवण्याच्या विधेयकावरून गदारोळ; अरविंद केजरीवालांनी अमित शहांना विचारले फक्त प्रश्न दोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.