Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Public Sector Banks Fines : मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाली बँकांची ‘इतक्या’ कोटींची कमाई; आकडे हादरवणारे

Public Sector Banks Fines : भारतात, सरकारी आणि खाजगी बँका बचत खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून मोठा दंड आकारतात. पण तुम्हाला माहिती आहे का की किमान शिल्लक रकमेच्या नावाखाली बँका किती पैसे कमवतात?

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 14, 2025 | 07:51 PM
Banks got 9 thousand crores in 5 years because only minimum balance

Banks got 9 thousand crores in 5 years because only minimum balance

Follow Us
Close
Follow Us:

Banks ₹9,000 Crore Minimum Balance : भारतातील बँकिंग ग्राहकांसाठी ‘किमान शिल्लक रक्कम’ (Minimum Balance) हा शब्द अपरिचित नाही. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतलाच असेल थोडेसे पैसे कमी पडले, आणि महिन्याच्या शेवटी खात्यातून दंड कापला गेला. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, अशा दंडाच्या नावाखाली बँका नेमके किती कमावतात? नुकत्याच उघड झालेल्या आकड्यांवर नजर टाकली, तर तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल.

पाच वर्षांचा आकडा चकित करणारा

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत भारतातील सरकारी बँकांनी किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल तब्बल ८,९३२.९८ कोटी रुपये दंडाच्या स्वरूपात ग्राहकांकडून वसूल केले. याचा अर्थ असा की, लाखो ग्राहक आपल्या खात्यात ‘Minimum Balance’ राखू शकले नाहीत, आणि त्या प्रत्येक वेळेला बँकेच्या खात्यात दंडाच्या रुपाने कोट्यवधी रुपये जमा होत गेले.

कोणत्या बँकेने किती वसूल केले?

या कालावधीत इंडियन बँक दंड वसुलीच्या यादीत अव्वल ठरली. तिने तब्बल १,८२८ कोटी रुपये ग्राहकांकडून घेतले. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक (PNB) ने १,६६२ कोटी रुपये आणि बँक ऑफ बडोदाने १,५३१ कोटी रुपये जमा केले. कॅनरा बँकने १,२१२ कोटी रुपये, तर बँक ऑफ इंडियाने ८०९ कोटी रुपये वसूल केले. याउलट, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने २०२० मध्येच हा दंड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Zardari Kashmir Speech : झरदारींचा पुन्हा काश्मीरवर विषारी प्रहार; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतावर खोटारडे आरोप

किमान शिल्लक म्हणजे काय?

 किमान शिल्लक किंवा ‘सरासरी मासिक शिल्लक’ (Average Monthly Balance – AMB) ही ती रक्कम आहे जी प्रत्येक ग्राहकाने आपल्या  खात्यात दरमहा राखणे बंधनकारक असते. ही रक्कम बँकेनुसार, तसेच शहरी-ग्रामीण भागानुसार बदलते. उदाहरणार्थ, पंजाब नॅशनल बँकेत शहरी भागातील किमान शिल्लक ₹२,०००, लहान शहरांत ₹१,०००, तर ग्रामीण भागात केवळ ₹५०० आहे. जर ही रक्कम कमी पडली, तर दंड आकारला जातो, जो ₹१०० ते ₹२५० पर्यंत असू शकतो.

ग्राहकांसाठी दिलासा देणारे बदल

एसबीआयनंतर, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांनी किमान शिल्लक रकमेवरील दंड पूर्णपणे रद्द केला आहे. यामागील उद्देश स्पष्ट आहे अधिकाधिक लोकांना बँकिंग सेवांशी जोडणे, विशेषतः ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये. अर्थ मंत्रालयानेही बँकांना अशा दंडात कपात किंवा रद्द करण्याचा सल्ला दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : K2 सर करण्याचे स्वप्न झाले पूर्ण पण परतताना मात्र गाठले मृत्यूने; चिनी गिर्यारोहकाचा दगड पडल्याने मृत्यू

ग्राहकांसाठी संदेश

किमान शिल्लक राखणे म्हणजे केवळ बँकेचा नियम पूर्ण करणे नाही, तर आपल्या आर्थिक शिस्तीचा भाग आहे. मात्र, बँका या नावाखाली मोठी कमाई करत होत्या, हे समजल्यावर अनेकांना धक्का बसू शकतो. आता मोठ्या प्रमाणात बँका हा नियम रद्द करत असल्याने, सामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Web Title: Banks got 9 thousand crores in 5 years because only minimum balance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 07:51 PM

Topics:  

  • Bank
  • bank accounts
  • Indian Bank

संबंधित बातम्या

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र
1

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

आता 100 कोटींपासून सुरू होतील स्वस्त FDI कर्ज, कशी असणार प्रक्रिया
2

आता 100 कोटींपासून सुरू होतील स्वस्त FDI कर्ज, कशी असणार प्रक्रिया

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! बँक खात्यात मिनिमम बॅलन्सची कटकट संपली; ‘या’ ८ बँकांमध्ये आता शून्य बॅन्सवरही काम होणार
3

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! बँक खात्यात मिनिमम बॅलन्सची कटकट संपली; ‘या’ ८ बँकांमध्ये आता शून्य बॅन्सवरही काम होणार

Fixed Deposit वर आता 8.40% पर्यंत व्याज मिळणार, ‘या’ बँकांमध्ये मिळतंय अधिक रिटर्न्स
4

Fixed Deposit वर आता 8.40% पर्यंत व्याज मिळणार, ‘या’ बँकांमध्ये मिळतंय अधिक रिटर्न्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.