
vikhe patil
विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर कडवी टीका केली. ‘आघाडी सरकारच्या काळात चौकशीच्या नावाखाली संस्थांवर दहशतवाद केला गेला. त्या काळात सहकारी साखर कारखाने खासगी झाले, अनेक बँका उद्ध्वस्त झाल्या’, असं विधान करत आघाडी सरकारवर घणाघात केला. ‘आज आपण सहकार चळवळीला पुन्हा गतवैभव मिळवण्याचा निर्धार केला आहे. महिला बचत गट खऱ्या अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. जिल्हा बँकेने महिला गटांना पतपुरवठा करून त्यांच्या हाती आर्थिक शक्ती द्यावी’, असे आवाहन करत राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
मंत्री विखे पाटील बँकेच्या पारदर्शकतेबाबत बोलताना सांगितलं की, ‘नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा इतिहास हा सहकार, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा आहे. सत्ता स्वार्थासाठी वापरण्यामुळे अनेक बँका कोसळल्या. मात्र नगर जिल्हा बँकेने शिस्त आणि पारदर्शकतेमुळे जनतेचा विश्वास जिंकला’.
मोतीभाऊ फिरोदिया, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, मारुतराव घुले पाटील, सहकार महीं भाऊसाहेब थोरात यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे ही बैंक प्रगतीच्या शिखरावर आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून फक्त शेतकरी आणि ग्रामीण विकासाच्या कार्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे नगर जिल्हा बँकेचा उत्कर्ष साधला, असे पालकमंत्री विखे पाटील यानी नमूद केले.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, नगर जिल्हा बँकेची वाटचाल ऐतिहासिक आहे. बँकेच्या मुख्यालयाचे आधुनिक स्वरूप पाहता ते एक कार्पोरेट ऑफिस वाटते, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांनी सहकाराची पायाभरणी केली. सामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करण्याचे कार्य नगर जिल्ह्याने केले आहे. आता काळानुरूप स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचा वापर आवश्यक आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने देशभरातील सहकार मंत्र्यांच्या बैठकांमुळे सहकाराला नवी दिशा मिळत आहे.