Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधी हे भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक…: लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांवर कोणी केला आरोप?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. राहुल गांधी हे भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक असल्याची टीका भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 23, 2025 | 04:14 PM
राहुल गांधी हे भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक…: लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांवर कोणी केला आरोप?
Follow Us
Follow Us:

Rahul Gandhi : नवी दिल्ली : यंदाचे हिवाळी अधिवेशन हे जोरदार चर्चेत राहिले. मनरेगाचे नामांतरण आणि अशा अनेक विषयांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. यामध्ये विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात हल्लाबोल केला. यानंतर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. राहुल गांधी हे भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक असल्याची टीका भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केली आहे.

भाजप खासदार मनोज तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य करत राहुल गांधींवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यात पुन्हा एकदा भाजप आणि आरएसएसविरुद्ध विधाने केली आहेत. त्यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि भाजप देशाच्या संस्थांवर कब्जा करत असल्याचा दावा केला आहे. भाजप नेते मनोज तिवारी यांनी राहुल गांधींच्या विधानांवर हल्ला केला आणि देशाची बदनामी करण्यासाठी देशविरोधी शक्तींशी संगनमत करत असल्याचा आरोप केला आहे.

हे देखील वाचा : RSS- काँग्रेसमध्ये वाद पेटणार? सरसंघचालकांच्या ‘त्या’ विधानावर उदीत राज यांची टीका; म्हणाले, “हिंमत असेल…”

खासदार मनोज तिवारी म्हणाले की, “राहुल गांधी यांनी हे सिद्ध केले आहे की त्यांना भारताचे नेते बनण्यात रस नाही. राहुल गांधींच्या मते, भारताने जागतिक नेता होण्याचा विचारही करू नये. यावरून हे दिसून येते की हे लोक भारताचे किती मोठे शत्रू आहेत. आज, जगातील आर्थिकदृष्ट्या समृद्ध देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. आपण लवकरच तिसऱ्या क्रमांकावर असू.” असे देखील मनोज तिवारी म्हणाले आहेत.

राहुल गांधी भारतविरोधी मानसिकतेने ग्रस्त – मनोज तिवारी

पुढे ते म्हणाले की, “भारत आज केवळ आर्थिक बाबतीतच नाही तर ज्ञान, विज्ञान आणि संस्कृतीसह इतर अनेक क्षेत्रांमध्ये जगातील नंबर वन देश आहे. आपली मुले अमेरिकेत देशाचे गौरव करत आहेत. इतर देश भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून मोठी कामगिरी करत आहेत. भारतीय औषधे अमेरिका आणि रशियाला निर्यात केली जात आहेत. असे असूनही, राहुल गांधींचा असा विश्वास आहे की भारताने जागतिक नेता होण्याचा प्रयत्नही करू नये. यावरून त्यांची भारतविरोधी मानसिकता स्पष्ट होते,” अशा शब्दांत मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

हे देखील वाचा : राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचे जागावाटप काल रात्री…! अमराठी जागांसाठी खास प्लॅन? खासदार राऊतांनी स्पष्ट सांगितल

पंतप्रधान मोदींना शिव्या देताना ते देशाला शिव्या देत आहेत – गिरीराज सिंह

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आणि म्हटले की, “राहुल गांधी हताश आहेत. त्यांना काय बोलत आहेत हे कळत नाही. पंतप्रधान मोदींना शिव्या देताना ते देश आणि संस्थांना शिव्या देत आहेत.” दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ म्हणाले, “राहुल गांधींचा परदेश दौरा भारतविरोधी आहे. परदेशात भारतीय संस्थांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.” असे ते म्हणाले आहेत.

Web Title: Bjp leader manoj tiwari target congress mp rahul gandhi statement on india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 04:14 PM

Topics:  

  • manoj tiwari
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका
1

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
2

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
3

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
4

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.