Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अमेरिकेच्या दबावाखाली धोरण का बदलले? काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचा थेट सरकारला सवाल

भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यामुळे विरोधी पक्ष कॉंग्रेस आक्रमक भूमिका घेतल आहे. यामुळे भूपेश बघेल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 12, 2025 | 04:57 PM
Congress Bhupesh Baghel targets Modi government over Donald Trump ino pak war ceasefire announcement

Congress Bhupesh Baghel targets Modi government over Donald Trump ino pak war ceasefire announcement

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तान सैन्याने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सेनेने हे सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्तानने एका रात्रीमध्ये 400 हून अधिक ड्रोन हल्ले केले असल्याची माहिती भारतीय सेनेकडून देण्यात आली. यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूरसह भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थी केल्यामुळे युद्धबंदी लागू झाली आहे. मात्र अमेरिकेने मध्यस्थी केल्यामुळे कॉंग्रेसने संशय व्यक्त केला आहे.

भारत पाकिस्तान युद्धामध्ये पडणार नाही आणि बोलणार नाही. या प्रश्न त्या दोन देशांमधील असल्याची भूमिका अमेरिकेने घेतली होती. मात्र भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन युद्धबंदीची घोषणा केली. यामुळे देशातील विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच कॉंग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी संशय घेत अमेरिकेच्या दबावाखाली सरकारने आपले धोरण बदलले का? असा सवाल विचारला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, “काँग्रेस सैन्यासोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे. जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा काँग्रेसने राजकारणापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले. 1971 मध्ये अमेरिकेच्या दबावाला न जुमानता इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन भाग केले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपल्याला राजकारणाची नाही तर राष्ट्रवादाची गरज आहे. शत्रूसमोर कमकुवतपणा नव्हे तर ताकद दाखवा. सरकारने स्पष्ट करावे की आपण अमेरिकेच्या दबावाखाली आपले धोरण बदलले का? काँग्रेसने आपले सर्व कार्यक्रम रद्द केले. संकटाच्या वेळी, जेव्हा संपूर्ण देश एकजूट होता, तेव्हा भाजप नेते सोशल मीडियावर राजकीय विधाने करत होते.” अशी टीका भूपेश बघेल यांनी केली आहे.

भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या पाठीशी उभी आहे पण आम्ही पारदर्शकतेची मागणी करतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली युद्धबंदीची घोषणा ही राजनैतिक अपयश नाही का? आपण तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारली का? शिमला करार रद्द झाला का? आपण दहशतवादाविरुद्ध लढत होतो आणि काश्मीर मुद्दा मध्येच आला! युद्धबंदीच्या अटी काय आहेत हे सांगण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे? शंका दूर करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे.” अशी मागणी कॉंग्रेस नेते भूपेश बघेल यांनी केली आहे.

‘पहलगामच्या दहशतवाद्यांचे काय झाले?’

ते पुढे म्हणाले की , “बदला घेतला गेला आहे हे भाजप प्रवक्त्याचे विधान अनेक प्रश्न उपस्थित करते. पहलगामच्या चार दहशतवाद्यांचे काय झाले? ते पकडले गेले की मारले गेले? सुरक्षेतील त्रुटींना कोण जबाबदार आहे? गृहमंत्री राजीनामा देत आहेत का?” असे अनेक सवाल कॉंग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उपस्थित केले आहेत.

Web Title: Congress bhupesh baghel targets modi government over donald trump ino pak war ceasefire announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 04:57 PM

Topics:  

  • Congress
  • India Pakistan Ceasefire
  • india pakistan war
  • Opreation Sindoor

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case : सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव; खरात प्रकरणावरुन काँग्रेसचा आरोप
1

Ashok Kharat Case : सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव; खरात प्रकरणावरुन काँग्रेसचा आरोप

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?
2

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार
3

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार

Prashant Padole Accident : काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा भीषण अपघात; एअरबॅग उघडल्या नाहीच अन्..
4

Prashant Padole Accident : काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा भीषण अपघात; एअरबॅग उघडल्या नाहीच अन्..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.