Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2025 : निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांचे टीकास्त्र; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये शेतकरी, नोकरदार आणि महिला वर्गासाठी अनेक घोषणा केल्या. यावरुन आता राहुल गांधींनी टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 01, 2025 | 04:42 PM
congress leader mp rahul gandhi aggressive reaction on union budget 2025 by bjp

congress leader mp rahul gandhi aggressive reaction on union budget 2025 by bjp

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे अर्थसंकल्प जाहीर केले आहे. सलग आठव्यांदा अर्थसंकल्प जाहीर करण्याचा विक्रम देखील सीतारमण यांनी आपल्या नावे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर हे पहिलेच बजेट होते. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले होते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या अर्थसंकल्पातून नवीन कर प्रणाली आखण्यात आली असून यामधून 12 लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकरमधून वगळण्यात आले आहे. मात्र यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, जागतिक अनिश्चिततेच्या काळात, आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी एक आदर्श बदल आवश्यक होता, पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झाल्याचा घणाघात केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात आली आहे. अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांनी आता अर्थसंकल्पावरुन टीकेची झोड उठवली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दुसरीकडे, बसपा सुप्रीमो मायावती यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन राष्ट्रीय हिताचे कमी आणि राजकीय हिताचे जास्त असे केले आहे. मायावती यांनी लिहिले आहे की, “देशातील महागाई, गरिबी, बेरोजगारी यांच्या प्रचंड परिणामामुळे तसेच रस्ते, पाणी, शिक्षण, शांतता आणि आराम यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे, सुमारे १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातील लोकांचे जीवन खूपच कठीण झाले आहे. अडचणीत, ज्याचा केंद्रीय अर्थसंकल्प १००% आहे. याद्वारेही उपाय आवश्यक आहे. परंतु, काँग्रेसप्रमाणेच, सध्याच्या भाजप सरकारचा अर्थसंकल्पही लोकांच्या आणि राष्ट्रीय हितावर कमी, राजकीय हितावर जास्त केंद्रित असल्याचे दिसून येते. जर असं नसेल तर या सरकारच्या काळातही लोकांचे जीवन सतत त्रासदायक, दयनीय आणि दुःखी का आहे? ‘विकसित भारताचे’ स्वप्न बहुजनांच्या हिताचे असले पाहिजे,” असा टोला मायावती यांनी लगावला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल अपडेट घ्या जाणून एका क्लिकवर

त्याचबरोबर सपा प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारने अर्थसंकल्पाच्या आकडेवारीसह कुंभमेळ्यात मृत्यूमुखी पडलेल्यांचे आकडे द्यावेत, अशी मागणी केली. मात्र, पंतप्रधान मोदींनी याला सर्वसामान्यांसाठी खिसा भरणारा अर्थसंकल्प म्हटले आहे. या अर्थसंकल्पामुळे केवळ खासगी क्षेत्राला चालना मिळणार नाही तर देशात मोठे बदल पाहायला मिळतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्देवी बजेटवर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “गेल्या 10 वर्षांपासून मध्यमवर्गीय या बहिऱ्या आणि मुक्या सरकारकडून दिलासा मागत आहेत आणि आज त्यांची मागणी ऐकली गेली आहे. लोकसभेतील 240 (भाजपच्या जागा) च्या सत्तेमुळेच अहंकारी सरकारला त्यांचा आवाज ऐकण्यास भाग पाडले आहे. या घोषणेमुळे जनतेला दिलासा मिळेल. उत्पन्न वाढत नव्हते, बचत होत नव्हती, खर्च सतत वाढत होता. आता आयकरात सूट मिळाल्याने मध्यमवर्गाला दिलासा मिळाला आहे, मी त्याचे स्वागत करते,” असे मत खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Congress leader mp rahul gandhi aggressive reaction on union budget 2025 by bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • Budget 2025
  • MP Rahul Gandhi
  • Nirmala Sitharaman
  • Union Budget 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.