Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांची डेडलाईन संपली…; आतापर्यंत किती नागरिकांनी सोडला देश?

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर, वाघा अटारी सीमेवरून पाकिस्तानी नागरिक त्यांच्या मायदेशात परतत आहेत. आतापर्यंत अनेक नागरिक भारत सोडून गेले आहेत. तर ८४३ भारतीय नागरिक पाकिस्तानमधून भारतात परतले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 28, 2025 | 10:58 AM
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांची डेडलाईन संपली…; आतापर्यंत किती नागरिकांनी सोडला देश?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी दिलेली अंतिम मुदत रविवारी संपली. सरकारच्या निर्णयापासून वाघा-अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांच्या त्यांच्या देशात परतण्याच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत किती लोक भारत सोडून गेले आहेत आणि किती अजूनही भारतात आहेत. असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना आणि पाकिस्तान सरकारने भारतीय नागरिकांना त्यांच्या देशात परतण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमनंतर २४ एप्रिलच्या स्थितीनुसार हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.पंजाब पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांत अटारी सीमेवरून ५३७ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले आहेत. याच दरम्यान, ८५० भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.

लहान मुलांसाठी घरी बनवा टेस्टी Cheese Burger; फार सोपी आणि झटपट आहे रेसिपी

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचा आदेश दिला होता, ज्याची मुदत आज, २७ एप्रिल रोजी संपली आहे. वैद्यकीय व्हिसाधारकांसाठी २९ एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. १२ प्रकारच्या व्हिसाधारकांसाठी भारत सोडण्याची मुदत २७ एप्रिलला संपली आहे, तर SAARC व्हिसाधारकांसाठी ही मुदत २६ एप्रिल होती. मात्र, दीर्घकालीन व्हिसाधारकांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

इतके पाकिस्तानी परतले

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात परतणाऱ्या नागरिकांवरील मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत ५३१ नागरिक वाघा अटारी सीमेवरून त्यांच्या देशात परतले आहेत. रविवारी, २३७ पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात परतले, तर ११६ भारतीय पाकिस्तानातून भारतात परतले. यानंतर, पाकिस्तानातून परतणाऱ्या नागरिकांची संख्या ८४३ झाली आहे.

कोणत्या दिवशी किती नागरिक  पाकिस्तानात परतले आणि भारतीय आले?

२४ एप्रिल रोजी २८ नागरिक पाकिस्तानला गेले आणि १०५ भारतीय परतले
२५ एप्रिल रोजी १९१ नागरिक पाकिस्तानला गेले आणि २८७ भारतीय परतले
२६ एप्रिल रोजी ७५ नागरिक पाकिस्तानला गेले आणि ३३५ भारतीय परतले
२७ एप्रिल रोजी २३७ नागरिक पाकिस्तानला गेले, ११६ भारतीय परतले

MI vs LSG : Jaspreet Bumrahची कमाल, IPL मध्ये मुंबई इंडियन्ससाठी केली मोठी कामगिरी, असे करणारा ठर

२९ एप्रिल हा शेवटचा दिवस असेल

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर केंद्रसरकारकडून पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलत पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेले पाकिस्तानी नागरिक २९ एप्रिलपर्यंत भारतात राहू शकतात, परंतु त्यानंतर त्यांना भारत सोडावा लागेल.

दिल्लीत ५ हजार पाकिस्तानी

सरकारच्या निर्णयानंतर आतापर्यंत ५३१ नागरिक पाकिस्तानात परतले आहेत. दरम्यान, इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने दिल्ली पोलिसांना एक अहवाल सादर केला आहे. आयबीने आपल्या अहवालात दिल्लीच्या विविध भागात राहणाऱ्या ५,००० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली आहे आणि त्यांची माहिती दिल्ली पोलिसांना दिली आहे, ज्यांच्याविरुद्ध २९ एप्रिलनंतर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

Web Title: Deadline for pakistani citizens has passed how many citizens have left the country so far

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 10:16 AM

Topics:  

  • Jammu Kashmir News
  • Pahalgam Terror Attack
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast प्रकरणात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबईत थेट 3 जणांना…
1

Delhi Bomb Blast प्रकरणात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबईत थेट 3 जणांना…

Delhi Bomb Blastसाठी सिग्नल अॅपचा वापर आणि आय-२० कार खरेदी; चौकशीदरम्यान आरोपी डॉक्टरांनी सगळं सांगितलं
2

Delhi Bomb Blastसाठी सिग्नल अॅपचा वापर आणि आय-२० कार खरेदी; चौकशीदरम्यान आरोपी डॉक्टरांनी सगळं सांगितलं

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; हमासच्या मॉड्यूलनुसार रॉकेटहल्ल्याचा होता कट
3

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; हमासच्या मॉड्यूलनुसार रॉकेटहल्ल्याचा होता कट

Terrorist Dr. Umar viral video : आत्मघाती हल्ल्याबाबत ओकले विष; दहशतवादी उमरचा दिल्ली बॉम्बस्फोटपूर्वीचा Video Viral
4

Terrorist Dr. Umar viral video : आत्मघाती हल्ल्याबाबत ओकले विष; दहशतवादी उमरचा दिल्ली बॉम्बस्फोटपूर्वीचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.