Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत आणि चीन यांच्यातील वाद संपणार? LAC वर गस्त घालण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार

भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र हा वाद लवकरच संपणार असल्याची चर्चा आहे. पेट्रोलिंगवर सहमती झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 21, 2024 | 04:42 PM
भारत आणि चीन यांच्यातील वाद संपणार? LAC वर गस्त घालण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार (फोटो सौजन्य-X)

भारत आणि चीन यांच्यातील वाद संपणार? LAC वर गस्त घालण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

भारत आणि चीनने आपले सैन्य मागे घेण्याबाबत आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी नवीन करार केला आहे. अहवालानुसार हा करार डेपसांग आणि डेमचोक भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संघर्षाच्या या दोन्ही ठिकाणी (डेपसांग आणि डेमचोक) गस्त सुरू झाली असून लवकरच दोन्ही देश आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात करतील, याला लष्करी भाषेत डिसेंगेजमेंट म्हणतात. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी (21 ऑक्टोबर) याबाबत माहिती दिली.2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव दोन्ही देशांमध्ये गस्त व्यवस्थेबाबत झालेल्या करारामुळे हळूहळू निवळत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्र्यांकडून देण्यात आली.

चीनसोबतच्या सीमावादावर परराष्ट्र मंत्रालयाने मोठी माहिती दिली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पूर्व लडाखमधील सीमा विवादाच्या मुद्द्यावर भारत आणि चीनचे वाटाघाटी गेल्या काही आठवड्यांपासून संपर्कात आहेत. LAC वर गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात करार झाला आहे. चीनसोबत अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत. पेट्रोलिंगवर सहमती झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी झाला आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले की, LAC वर वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सैनिकांना माघार घ्यावी लागली आहे. चीनसोबतचे अनेक प्रश्नही सोडवण्यात आले आहेत. यासोबतच त्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेचीही माहिती दिली. त्यात संस्थापक सदस्यांसोबतच नवीन सदस्यांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे मिस्त्री यांनी सांगितले.

शिखर परिषदेत दोन मुख्य सत्रे होतील

22 ऑक्टोबरपासून शिखर परिषद सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी नेत्यांसाठी डिनर असेल. शिखर परिषदेचा मुख्य दिवस 23 ऑक्टोबर आहे. दोन मुख्य सत्रे असतील. तर सकाळच्या सत्रानंतर, शिखर परिषदेच्या मुख्य विषयावर दुपारी खुले सत्र होईल. नेत्यांनी कझान घोषणेचा अवलंब करणे देखील अपेक्षित आहे. ज्यामुळे ब्रिक्सचा मार्ग मोकळा होईल. 24 ऑक्टोबरला शिखर परिषद संपणार आहे.

पंतप्रधान अनेक द्विपक्षीय बैठक

चीनसोबतच्या सीमावादाची ही माहिती ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या रशियातील कझान शहराच्या भेटीच्या एक दिवस आधी आली आहे. शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान अनेक द्विपक्षीय बैठकाही घेऊ शकतात. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे.

रशिया-युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढायला गेलेल्या काही भारतीयांची माहितीही परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ज्यांना बेकायदेशीरपणे किंवा इतर मार्गाने रशियन सैन्यात लढण्यासाठी पाठवण्यात आले आहे, त्यांच्याबाबत आमच्या दूतावासाचे अधिकारी या प्रकरणाबाबत रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. सुमारे 85 लोक रशियामधून परतले आहेत. सुमारे 20 लोक बाकी आहेत.

Web Title: India and china reach agreement on border patrolling along lac foreign secretary misri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • China
  • india

संबंधित बातम्या

या १० मोटरसायकल ज्या होतील २०२६ च्या शेवटच्या ५ महिन्यात! पहा कोणत्या असतील या बाईक
1

या १० मोटरसायकल ज्या होतील २०२६ च्या शेवटच्या ५ महिन्यात! पहा कोणत्या असतील या बाईक

India Snack Market: ईमामी अ‍ॅग्रोटेकचे स्नॅकिंग क्षेत्रात दमदार पदार्पण; WeMe ब्रँडसाठी 750 कोटींची गुंतवणूक
2

India Snack Market: ईमामी अ‍ॅग्रोटेकचे स्नॅकिंग क्षेत्रात दमदार पदार्पण; WeMe ब्रँडसाठी 750 कोटींची गुंतवणूक

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप
3

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप

Sheikh Hasina: शेख हसीना यांच्या ऑनलाइन भाषणावरून भारत-बांगलादेश संबंध ताणले जाणार? ढाकाकडून भारताकडे स्पष्टीकरणाची मागणी
4

Sheikh Hasina: शेख हसीना यांच्या ऑनलाइन भाषणावरून भारत-बांगलादेश संबंध ताणले जाणार? ढाकाकडून भारताकडे स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.