Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा, पण…’; राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यानंतर चीन सीमावादावर चर्चा करण्यास तयार

भारत आणि चीनमधील तणावपूर्ण संबंधांमध्ये पुन्हा एकदा संवादाचा नवा मार्ग खुला झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अलीकडील चीन भेटीनंतर बीजिंगने डिलिमिटेशन (सीमारेषा निश्चिती) वर चर्चा करण्यास तयारी दर्शवली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 01, 2025 | 01:23 AM
'भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा, पण...'; राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यानंतर चीन सीमावादावर चर्चा करण्यास तयार

'भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा, पण...'; राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यानंतर चीन सीमावादावर चर्चा करण्यास तयार

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि चीनमधील तणावपूर्ण संबंधांमध्ये पुन्हा एकदा संवादाचा नवा मार्ग खुला झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अलीकडील चीन भेटीनंतर बीजिंगने डिलिमिटेशन (सीमारेषा निश्चिती) वर चर्चा करण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र भारतासोबतचा सीमा विवाद अत्यंत गुंतागुंतीचा असून त्याच्या समाधानासाठी वेळ लागेल, असंही म्हटलं आहे.

Karnataka Politics : कर्नाटकातील CM पदाचे दावेदार देशातील सर्वात श्रीमंत आमदार; अफाट संपत्तीचे मालक, कुठून येतो पैसा?

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सोमवारी दिलेल्या वक्तव्यात हे संकेत दिले. हे विधान अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा २६ जून रोजी चीनच्या क़िंगदाओ शहरात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेदरम्यान भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे समकक्ष डोंग जून यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली होती.

या चर्चेदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-चीन सीमावादावर स्पष्ट आणि संरचित रोडमॅपची मागणी केली. एलएसीवरील (लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल) तणाव कमी करण्यासाठी आणि विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचा त्यांनी आग्रह धरला. त्यांनी स्पष्ट केलं की दोन्ही देशांनी यासाठी आधीच तयार केलेल्या विशेष प्रतिनिधी यंत्रणेला अधिक सक्रीय करावं.

प्रवक्त्या माओ निंग यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “भारत आणि चीन यांच्यात सीमावाद गुंतागुंतीचा आहे आणि त्याच्या निवारणासाठी वेळ आणि धैर्य आवश्यक आहे.” त्यांनी हेही नमूद केलं की दोन्ही देशांनी याआधीच विविध संवादमंच स्थापन केले असून, त्यांचा उपयोग करून शांती आणि स्थिरता राखण्यावर भर द्यावा.

जेव्हा माध्यमांनी विचारलं की विशेष प्रतिनिधींच्या २३ बैठकांनंतरही सीमावादावर तोडगा का निघालेला नाही, तेव्हा माओ निंग म्हणाल्या, “सीमा प्रश्न सहजपणे सुटणारा नाही. पण संवाद सुरु आहे, हेच या प्रक्रियेचं बलस्थान आहे.”

तसेच, जेव्हा टाइमलाइनबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी थेट उत्तर न देता एवढंच म्हटलं की, “आम्ही आशा करतो की भारतही चीनसह एकाच दिशेने काम करत राहील, जेणेकरून सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य टिकून राहील.”

भूतकाळातील संघर्षांची पार्श्वभूमी
भारत आणि चीनमध्ये ३,४८८ किमी लांबीची सीमा आहे, जी तीन विभागांमध्ये विभागली गेली आहे — पश्चिम (लडाख), मध्य (उत्तराखंड-हिमाचल) आणि पूर्व (अरुणाचल प्रदेश). या तिन्ही विभागांमध्ये सीमावाद आहे, पण विशेषतः अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशवरून तणाव अधिक आहे.

२०१७: डोकलाम संघर्ष — भारत-भूतान-चीन त्रिसंधी भागात चीनच्या रस्ताबांधणीविरोधात भारताने रोख लावला. ७३ दिवस तणाव.

२०२०: गलवान हिंसक चकमक — एलएसीवरील झडपमध्ये भारताचे २० जवान शहीद. चीनने नंतर चार सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली.

२०२२: तवांगमधील झडप — अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे पुन्हा दोन्ही देशांतील सैन्य आमनेसामने आलं.

BJP New State President : भाजपच्या फायरब्रॅंड नेत्याचा पक्षाला रामराम; अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे वरिष्ठ नेते वांग यी यांच्यात विशेष प्रतिनिधींची २३वी बैठक झाली होती. या बैठकीत २०२४ मधील डिसएंगेजमेंट करारावर पुनःमंजुरी देण्यात आली. त्यानुसार, काही भागांमध्ये गस्त आणि जनावरांच्या चरण्याची मुभा पुन्हा देण्यात आली.

या पार्श्वभूमीवर क़िंगदाओमध्ये राजनाथ सिंह यांनी चीनसमोर ठाम भूमिका मांडली. त्यांनी २०२० नंतर निर्माण झालेल्या विश्वासाच्या तुटवड्याचा उल्लेख करत सीमा भागात “जमीनी पातळीवर ठोस पावलं उचलण्याची” गरज स्पष्ट केली. डिलिमिटेशन प्रक्रिया गतीने राबवण्याची त्यांची मागणी चीनने गांभीर्याने घेतल्याचे संकेत आता मिळत आहेत.

भारत-चीन सीमावादावर तोडगा अद्याप धूसर आहे. मात्र राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर चीनने डिलिमिटेशन चर्चेसाठी तयारी दर्शवली, हे एक सकारात्मक पाऊल मानलं जात आहे. तरीही चीनने स्पष्टपणे सूचित केलं आहे की, हा एक दीर्घकालीन आणि जटिल प्रश्न असून संयम आणि संवादच यावर उपाय असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: India china border dispute complicated ready to discuss delimitation mao ning says sino

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 01:01 AM

Topics:  

  • India china Border Clash
  • India China border relations
  • LAC India China

संबंधित बातम्या

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
1

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

ड्रॅगन सुधारणार नाहीच! रोबोट डॉग आणि हायटेक शस्त्रांसह भारतीय सीमेजवळ चीनचा पुन्हा युद्धसराव
2

ड्रॅगन सुधारणार नाहीच! रोबोट डॉग आणि हायटेक शस्त्रांसह भारतीय सीमेजवळ चीनचा पुन्हा युद्धसराव

भारत चीन बैठक ठरणार निर्णायक! ‘या’ मुद्यांवर निर्णय होण्याची शक्यता, पाहा भेटीची पहिली झलक
3

भारत चीन बैठक ठरणार निर्णायक! ‘या’ मुद्यांवर निर्णय होण्याची शक्यता, पाहा भेटीची पहिली झलक

SCO Summit Beijing : ‘भारत-चीन संबंधांमध्ये तिबेटच काटा…’ जयशंकर यांच्या दौऱ्यापूर्वी ड्रॅगनने दाखवले खरे रंग
4

SCO Summit Beijing : ‘भारत-चीन संबंधांमध्ये तिबेटच काटा…’ जयशंकर यांच्या दौऱ्यापूर्वी ड्रॅगनने दाखवले खरे रंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.