रायपूर: छत्तीसगड आणि ओडीशा सीमेवर सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. 19 जानेवारी रात्रीपासून ही चकमक सुरू होती. दरम्यान या कारवाईत भारतीय सैन्य दलांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. छत्तीसगड-ओडीशा सीमेवरील गरीयाबंद जिल्ह्यातील जंगलांमध्ये ही धुमश्चक्री सुरू होती. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सुरक्षा यंत्रणेने केलेल्या कारवाईमध्ये एकूण 14 नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यात 2 महिला नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे. मैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या जंगलात सुरक्ष यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू होती. दरम्यान या ठिकाणी नक्षलवादी असल्याचे काळातच स्थानिक पोलीस, आणि कोब्रा कमांडो यांनी पुनर जंगलाला वेढा घातला. त्यांना जोरदार गोळीबारात 14 नक्षलवादी थरे झाले आहेत. तर एक कोब्रा कमांडो जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
या जंगलात सुरू असलेली कारवाई अजूनही सुरूच आहे. या ठिकाणी अजून नक्षलवादी लपले असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणेला आहे. त्यामुळे परिसरात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू असून पोलिसांची कुमक देखील या ठिकाणी पोहोचत आहे. कोब्रा कमांडो आणि पोलीस यंत्रणा संयुक्तपणे ही कारवाई करत आहेत. तसेच जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांना घेराव घातला जात आहे. एकही नक्षलवादी सुटून जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने नक्षलवादी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: Breaking: छत्तीसगडमध्ये जोरदार धुमश्चक्री; एका नक्षलवाद्याला कंठस्नान, CRPF जवानांचा जंगलाला वेढा
उपलब्ध माहितीनुसार, छत्तीसगड आणि ओडीशा सीमेवर सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. ओडीशा आणि छत्तीसगड पोलिसांनी सीआरपीएफच्या मदतीने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. सैन्य दले आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू असल्याचे म्हटले जात आहे. सुरक्षा यंत्रणेने संपूर्ण जंगलाला घेरले आहे.
सुरक्षा यंत्रणांनी 3 नक्षलवाद्यांना ठोकलं; छत्तीसगडमध्ये चकमकीचा थरार
गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकार आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. नक्षलवाद मूळापासून उखडून टाकण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सातत्याने सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झालेली पाहायला मिळते. दरम्यान छत्तीसगडमध्ये अशीच एक चकमक सुरक्षा यंत्रणामध्ये झाली आहे. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा यंत्रणेने 3 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सोरेनाम जंगलात सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी आमनेसामने आले. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा यंत्रणेने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत 3 नक्षलवादी मारले गेले. डीआरजी आणि एस्टीफ जवनांनी अजूनही सोरेनाम जंगलाला वेढा घातला असल्याचे समजते आहे. जवळजवळ 300 पेक्षा जास्त जवान हे या कारवाईत सहभागी असून त्यांनी संपूर्ण जंगल वेढले आहे. नक्षलवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.