पाकिस्तानने अजूनही धडा घेतला नसेल तर...; भारताने केलेल्या हल्ल्यानंतर कौस्तुभ गनबोटेंच्या पत्नीची प्रतिक्रिया
एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता होता. पहलगाम हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर भारतीय सेनेनं पाकिस्तानात घुसून जशाच तसे उत्तर दिले आहे. यात काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम यशश्वी केली आहे. पुण्यातील कौस्तुभ गनबोटे हे कुटुंबीयांसह काश्मीरला फिरायला गेले होते. हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. भारताने बदला घेतल्यानंतर गणबोटे कुटुंबीयाची प्रतिक्रीया आली आहे. दहशतवाद्यांना आता मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलंय, अशी प्रतिक्रिया गनबोटे यांच्या पत्नी संगीता गनबोटे यांनी दिली.
संगीता गनबोटे नेमकं काय म्हणाले?
“ऑपरेशन सिंदूर हे अत्यंत समर्पक नाव आहे. मोदींनी अत्यंत योग्य पाऊल उचचलं आहे. दहशतवादी म्हणाले होते की मोदीला जाऊन सांगा की आम्ही काय केलंय, त्याला आता मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आता पाकिस्तानला चांगला धडा मिळाला आहे. जर अजूनही त्यांनी धडा घेतला नसेल तर मोदी याहून कठोर पावलं उचलतील याची खात्री आहे”, असं संगीता गनबोटे म्हणाल्या. कौस्तुभ गनबोटे हे त्यांची पत्नी संगीता, संतोष जगदाळे, त्यांची पत्नी आणि जगदाळेंची मुलगी असे सर्वजण काश्मीरला फिरायला गेले होते.
भारताने कुठे केले हल्ले?
बहावलपुर : हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जैश-ए-मोहम्मदच मुख्यालय आहे. भारतीय सैन्य दलाच्या कारवाईत हे उद्धवस्त झालय.
मुरीदके : हा दहशतवादी तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथे लश्कर-ए-तैयबाचा तळ होता. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याशी याचा संबंध होता.
गुलपुर : हा दहशतवादी तळ LoC (पुंछ-राजौरी) पासून 35 किलोमीटर दूर आहे.
लश्कर कॅम्प सवाई : POK च्या तंगधार सेक्टरमध्ये 30 किलोमीटर आत आहे.
बिलाल कॅम्प : हा जैश-ए-मोहम्मदचा लॉन्चपॅड आहे. हा तळ दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरला जात होता.
कोटली : LOC पासून 15 किमी अंतरावर लष्करचा तळ होता. 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सामावून घेण्याची क्षमता होती.
बरनाला कॅम्प : हा दहशतवादी तळ LOC पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे.
सरजाल कॅम्प : सांबा-कठुआसमोर इंटरनॅशनल बॉर्डरपासून 8 किमी अंतरावर हा जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ होता.
मेहमूना कॅम्प (सियालकोट जवळ)– हा हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी प्रशिक्षण तळ होता. आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी अंतरावर होता.