
Madras High Court, Divorce Case, न
पतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन आणि न्यायमूर्ती एम. डी. सुमती यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोघांचे लग्न सप्टेंबर १९९२ मध्ये झाले होते. त्यांना ४ मुले आहेत. सध्या पतीचे वय ६७वर्षे आहे. न्यायालयाने म्हटले की, पती-पत्नीमध्ये मोठी कटुता निर्माण झाली असून पुन्हा एकत्र येण्याची कोणतीही शक्यता उरलेली नाही.
दिल्ली ते पाटणा हायस्पीड ट्रेन लवकरच धावणार; 1170 किमीचा प्रवास साडेचार तासांत होणार पूर्ण
दीर्घकाळ विभक्त राहणे, एकत्र न राहणे आणि वैवाहिक संबंध पूर्णपणे तुटणे ही मानसिक छळाची कारणे ठरू शकतात.
मद्रास उच्च न्यायालय (घटस्फोटाच्या प्रकरणावर)
पतीने पत्नीला मुंबईला नेले नाही, ही त्याचीच चूक पतीने याचिकेत म्हटले होते की, नोकरीसाठी तो तमिळनाडूतील शिवगंगाहून मुंबईला गेला; मात्र पत्नी त्याच्यासोबत आली नाही. २०१४ मध्ये त्याने शिवगंगा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. त्याने पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही केला. सप्टेंबर २०२१ मध्ये कौटुंबिक न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली. पती स्वतः नोकरीसाठी मुंबईला गेला आणि त्याने पत्नीला सोबत नेले नाही. त्यामुळे स्वतःच्या चुकीचा फायदा घेत पती घटस्फोट मागू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.
पती-पत्नी सुमारे १६ वर्षांपासून वेगळे राहत होते. पत्नीने पतीकडे परत जाण्यासाठी कोणतेही औपचारिक प्रयत्न केल्याचेही समोर आले नाही. दोघांमध्ये समझोता होण्याची शक्यता तपासण्यासाठी उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंशी चर्चा केली; मात्र त्यातून तोडगा निघाला नाही. त्यांच्या वैवाहिक नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे आणि पुन्हा एकत्र येण्याची शक्यता उरलेली नाही, दीर्घकाळ वेगळे राहणे, वैवाहिक जीवन संपुष्टात येणे आणि नाते पूर्णपणे तुटणे, परिस्थितीनुसार मानसिक क्रौर्याच्या कक्षेत येऊ शकते.