Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Almatti Dam: अलमट्टी धरणाच्या उंचीचा निर्णय राजधानीत होणार? महाराष्ट्रातून कर्नाटकच्या निर्णयाला विरोध वाढला

केंद्र सरकारने २०१० च्या कृष्णा जलतंटा लवादाच्या निकालानुसार राजपत्र अधिसूचना यासाठी जारी करणे आवश्यक आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने यासंदर्भात दिनांक ७  में  रोजी चार राज्य सरकारच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 06, 2025 | 07:15 PM
Almatti Dam: अलमट्टी धरणाच्या उंचीचा निर्णय राजधानीत होणार? महाराष्ट्रातून कर्नाटकच्या निर्णयाला विरोध वाढला

Almatti Dam: अलमट्टी धरणाच्या उंचीचा निर्णय राजधानीत होणार? महाराष्ट्रातून कर्नाटकच्या निर्णयाला विरोध वाढला

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर पर्यंत वाढवण्यासाठी तसेच कर्नाटकच्या हिश्याची पाणी वापरण्याकरिता राज्य सरकार वचनबद्ध आहे. याबाबत बुधवारी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे.  या बैठकीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार असणार आहे. दरम्यान या बैठकीत महाराष्ट्र शासन कोणती भूमिका घेणार याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

केंद्र सरकारने २०१० च्या कृष्णा जलतंटा लवादाच्या निकालानुसार राजपत्र अधिसूचना यासाठी जारी करणे आवश्यक आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने यासंदर्भात दिनांक ७  में  रोजी चार राज्य सरकारच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संबंधितांची मते जाणून घेण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारने उंची वाढवण्यासाठी कायदे तज्ञाची चर्चा केली आहे असे त्यांनी मत व्यक्त केले आहे ,या आधारे होणाऱ्या बैठकीत आपली भूमिका कर्नाटकचे प्रतिनिधी मांडणार आहेत.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने यापूर्वी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे .त्यासाठी आवश्यक तो निधी तरतूद केली जाईल आंध्र आणि तेलंगणा किती नफा तोटा झाला तरी धरणाची उंची आम्ही वाढवणारच अशी भूमिका कर्नाटकची आहे.  एका बाजूला कर्नाटक सरकार धरणाच्या उंचीबाबत आग्रही भूमिका घेत असताना महाराष्ट्र शासन  काय करणार ते अद्याप स्पष्ट झाले नाही. सध्या असलेल्या ५१९ मीटरच्या उंचीमुळे कोल्हापूर ,सांगली जिल्ह्यांना महापुराच्या काळात मोठा फटका बसतो. धरणाची उंची वाढल्यास अनेक पटीने धोका वाढणार आहे त्यामुळे या बैठकीत महाराष्ट्र शासनाने आपली महत्त्वपूर्ण भूमिका मांडणे आवश्यक आहे.

आलमट्टी धरणाच्या ऊंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध वाढला

कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे हालचाली सुरू केल्याने शिरोळ तालुक्यावर महापुराचे मोठे संकट उभे ठाकले आहे. जर ही उंची वाढण्यास केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली, तर दरवर्षी पावसाळ्यात शिरोळ तालुक्यातील गावांना महापुराचा सामना करावा लागेल. त्यामुळे भविष्यात धरणग्रस्त होण्याची वेळ आपल्या गावांवर येऊ नये, यासाठी वेळीच सावध होऊन आलमट्टीच्या उंचीवाढीला विरोध करणाऱ्या हरकती दाखल करा, असे आवाहन आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केले.

अलमट्टी धरणाच्या ऊंचीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ अत्यंत महत्वाचा निर्णयसांगली दोन जिल्ह्याच्या मुळावर उठलेल्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे या धरणाची उंची भविष्यात वाढणार नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना दिली.

Almatti Dam: “भविष्यात धरणग्रस्त होण्याची वेळ…”; आलमट्टी धरणाच्या ऊंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध वाढला

पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुराच्या घटना घडतात. त्यातीलच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. पश्चिम महाराष्ट्रात  महापूरची स्थिति निर्माण होते. त्याला कर्नाटक सरकार जबाबदार आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरला पुराचा फटका बसतो. सध्या या धरणाची ऊंची ५१९ मीटर इतकी आहे. मात्र आता कर्नाटक सरकारने या धरणाची ऊंची वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सांगली-कोल्हापूरवर महापूरचे संकट वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.

Web Title: Meeting in delhi today regarding the height of almatti dam kolhapur and sangli karnataka and maharashtra government news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 07:15 PM

Topics:  

  • Karnataka
  • kolhapur
  • Maharashtra Govenment

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: जिथे कुटुंब गमावलं, तिथेच संपवलं आयुष्य; पुण्यातील विराट गौतम यांची आत्महत्या
1

Kolhapur Crime: जिथे कुटुंब गमावलं, तिथेच संपवलं आयुष्य; पुण्यातील विराट गौतम यांची आत्महत्या

Ola-Uber Ban : महाराष्ट्र सरकारने केली ओला, उबर आणि रॅपिडोवर मोठी कारवाई; आता हे ॲप्स फोनमधून होऊ शकतात गायब
2

Ola-Uber Ban : महाराष्ट्र सरकारने केली ओला, उबर आणि रॅपिडोवर मोठी कारवाई; आता हे ॲप्स फोनमधून होऊ शकतात गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.