कोल्हापूरच्या हिंगणगाव येथे 20 गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच वडील व सख्ख्या भावाची कुऱ्हाडीने हत्या केली. आरोपीने स्वतःहून पोलिसात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. घटनेने परिसर हादरला.
गेल्या आठवडाभरापासून उन्हाच्या चटक्याने आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना शनिवारी पहिल्याच अवकाळी पावसाने थोडासा का होईना दिलासा दिला.
कोल्हापूर शहरालगत मनेरमळा परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला. डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
कोल्हापूरमधील KIT College of Engineering येथे पर्यावरण विभागप्रमुख प्रा. सौरभ जोशी यांच्यावर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून कॉलेजने त्यांना निलंबित केले आहे.
वाढत्या उन्हामुळे राज्यातील तलाव आणि पाणवठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. यामुळे भविष्यात तीव पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भरती प्रक्रिया जाहीर करताना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव व म्हापसा अशी पाच ठिकाणी जाहीर केली होती. परंतु लिपिक पदाच्या या भरतीसाठी जिल्हाभरातून ५०७७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
Kolhapur शहरात घंटागाडीमार्फत दारोदार कचरा संकलन होत असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. स्कॅनर प्रणाली लागू करूनही काही कर्मचाऱ्यांनी केवळ चार दिवस स्कॅन केल्याचे नाटक केल्याची तक्रार…
कागल नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व्यवस्थापन आणि शाश्वत विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय सन्मान मिळवला.
वाळवा तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे सावट पसरले आहे. अलीकडेच झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे. शेतकरी व मजुरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
घरातील नऊ हजार रुपयांच्या संशयातून संतापलेल्या मुलाने ८३ वर्षीय माजी सैनिक वडिलांवर दगडी वरवंट्याने वार करत त्यांची हत्या केली. शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे घडलेल्या आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौरांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे चिरंजीव सचिन पाटील यांना पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून दारूण पराभवाला सामोरे जावं लागलं…
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम यांची, तर उपमहापौरपदी जनसुराज्यशक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची शुक्रवारी बहुमताने निवड झाली.
कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील ‘मायक्रो आर्टिस्ट’ अशांत मोरे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. त्यांना आपली कला जागतिक स्तरावर देखील पोहोचवायची आहे.
आरळा-शेडगेवाडी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हे गेल्या एक-दीड वर्षापासून अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांना याचा फटका बसत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सतर्क झाली असून, करवीर तालुक्यातील वाशी गावात भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे.
पोटासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत ऊसतोडीसाठी येणाऱ्या मजुरांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सामाजिक जाणीवेचा ठोस प्रत्यय दिला आहे.