Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय, ‘या’ योजनेत होणार बदल

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेच्या रकमेत वाढ करुन मोदी सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 12, 2023 | 10:26 AM
मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय, ‘या’ योजनेत होणार बदल
Follow Us
Close
Follow Us:

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेच्या रकमेत वाढ करुन मोदी सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी मोदी सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. सरकार ही मदत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये देते. प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. आता या योजनेच्या रकमेत मोदी सरकार वाढ करण्याची शक्यता आहे. ही रक्कम 6000 रुपयावरुन 8000 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

…तर तिजोरीवर 20,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त ताण

या योजनेला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यास तिजोरीवर 20,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त ताण येईल. तर मार्च 2024 पर्यंत या योजनेसाठी 60,000 कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले आहे. पण अर्थमंत्रालयाचे प्रवक्ते नानू भसीन यांनी याप्रकरणात कुठलीही टिप्पणी करण्यास नकार दिला. भारतात गेल्या पाच वर्षात पावसाने हात आखडता घेतला आहे. यावर्षी तर सर्वाधिक परिणाम दिसून आला. त्यामुळे पिकांच्या उत्पादन घटले आहे. डिसेंबर 2018 पासून सबसिडीचा कार्यक्रम सुरु झाल्यापासून मोदी सरकारने 11 कोटी लाभार्थ्यांना एकूण 2.42 लाख कोटी रुपये वाटप केले आहेत.

अर्थसंकल्पात होणार घोषणा ? 

1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय अंतरिम अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने विविध मंत्रालये आणि विभागांशी सल्लामसलत सुरू केली आहे.

Web Title: Modi government will take a big decision for farmers there will be changes in this scheme nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2023 | 10:26 AM

Topics:  

  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • PM Kisan
  • PM Kisan Scheme

संबंधित बातम्या

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!
1

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती
2

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम
3

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम

हस्तकला, लोककलेच्या मागणीत घट; पेठांमधील ग्रहकांची संख्या कमी होत असल्यामुळे कारागिरांपुढे उपजीविकेचा प्रश्न
4

हस्तकला, लोककलेच्या मागणीत घट; पेठांमधील ग्रहकांची संख्या कमी होत असल्यामुळे कारागिरांपुढे उपजीविकेचा प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.