Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेमध्ये पहिलेच भाषण; कसाबच्या फाशीचा उल्लेख करत अनेक गौप्यस्फोट

महाराष्ट्रामधील प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त झाले आहेत. यानंतर आता त्यांनी पहिले भाषण दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 30, 2025 | 05:45 PM
MP Ujjwal Nikam's first speech in Rajya Sabha

MP Ujjwal Nikam's first speech in Rajya Sabha

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : संसदेमध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. नुकतेच ऑपरेशन सिंदूरवर खास चर्चा सत्र पार पडले आहे. यानंतर आता नुकतेच महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले खासदार उज्ज्वल निकम यांनी पहिले भाषण दिले आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून उज्ज्वल निकम यांना पाठवण्यात आले आहे. त्यानंतर आता राज्यसभेमध्ये उज्ज्वल निकम यांनी पहिले भाषण दिले. आपल्या पहिल्याच भाषणामध्ये निकम यांनी कसाबबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले असून कसाबच्या फाशीचा उल्लेख देखील केला आहे.

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

राज्यसभेमध्ये बोलताना खासदार उज्ज्वल निकम म्हणाले की, “मला त्या वेळी सांगण्यात आले की कसाबच्या विरोधात वेगवेगळ्या चार्ज शिट दाखल करण्यास सांगण्यात आले कारण लवकरात लवकर कसाबला फाशी देता येईल. ज्यावेळी होम बेस्ड टेरिरिस्ट दहशतवादी इस्लामबाद एअरपोर्टवर पोहचले. त्याठिकाणी पाकिस्तान सरकारकडून स्थलांतर पॉलिसी रद्द करण्याची व्यवस्था करुन ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट असून देखील इम्बारक्रेशन आणि डीस-इम्बारक्रेशनचे आरोप करता आले नाहीत. त्यांच्याकडे पासपोर्ट असून देखील कारवाई करता आली नाही,” असा गौप्यस्फोट खासदार उज्ज्वल निकम यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

उज्ज्वल निकम म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या सरकारने हे स्पष्ट केले आहे की आम्ही फक्त कागदपत्रांमध्ये लढत नाही, तर आम्ही मैदानात उत्तर देतो. भारत आता सहन करत नाही, भारत आता दृढनिश्चय करतो. आता भारत गप्प बसत नाही, भारत थेट प्रत्युत्तर देतो. जो पाकिस्तान एकेकाळी भारताला हलके मानत होता तोच आता भारताच्या प्रतिसादाला घाबरत आहे. हा बदल केवळ धोरणाचा नाही, तर तो नेतृत्व आणि सरकारच्या निर्णायक विचारसरणीचा आहे. तो नरेंद्र मोदींच्या सरकारच्या विचारसरणीचा आहे.” असे म्हणत खासदार उज्ज्वल निकम यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, “या दहशतवाद्यांची चौकशी करण्यात आली त्यावेळी त्यांनी कोर्टामध्ये सांगितले की आम्ही गुन्हा कबुल करतो. याचे चार्ज शीट मुंबई पोलीसांनी दाखल केली होती आणि त्यानंतर सर्व तपास हा केंद्रीय तपास यंत्रणांकडे वर्ग करण्यात आला. यावेळी आम्ही रेजिंग वॉर एगन्स्ट गव्हरमेंट ऑफ इंडिया हा चार्ज लावला होता. मात्र केंद्रीय तपास यंत्रणेने हा चार्ज काढून टाकला. तो का काढला,” असा सवाल उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला आहे.

उज्ज्वल निकम म्हणाले की, “आम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानची जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा दहशतवाद्यांच्या बंदुका आपल्या निष्पाप नागरिकांकडे वळल्या, तेव्हा भारताने आपले मौन सोडले आणि ऑपरेशन सिंदूर हे उत्तर नव्हते तर एक संदेश होता. त्यांनी सांगितले की, ही कारवाई केवळ लष्करी दृष्टिकोनातून यशस्वी नव्हती तर राजनैतिक दृष्टिकोनातून परिपक्वता देखील दर्शवते. कोणत्याही निष्पाप नागरिकाचे नुकसान होणार नाही याची आम्ही खात्री केली. एक जबाबदार लोकशाही म्हणून भारताची प्रतिमा आणखी मजबूत होईल याची आम्ही खात्री केली,” असे मत खासदार उज्ज्वल निकम यांनी आपल्या राज्यसभेच्या पहिल्या भाषणामध्ये व्यक्त केले.

Web Title: Mp ujjwal nikam first speech in rajya sabha mentioning kasab hanging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 05:45 PM

Topics:  

  • daily news
  • political news
  • Ujjwal Nikam

संबंधित बातम्या

‘…म्हणून उद्धव ठाकरेंना सोडून काढावा लागला दुसरा पक्ष’; शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचं मोठं विधान
1

‘…म्हणून उद्धव ठाकरेंना सोडून काढावा लागला दुसरा पक्ष’; शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचं मोठं विधान

Railway News : सुरक्षा दलाची उल्लेखनीय कामगिरी; २५.६५ लाखांचा हरवलेला माल प्रवाशांना परत
2

Railway News : सुरक्षा दलाची उल्लेखनीय कामगिरी; २५.६५ लाखांचा हरवलेला माल प्रवाशांना परत

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा
3

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा

कोथरुड-बाणेरमध्ये राजकीय रणकंदन! “अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरेंचा नॅरेटिव्ह खोटा”; लहू बालवडकर-गणेश कळमकर यांचा पलटवार
4

कोथरुड-बाणेरमध्ये राजकीय रणकंदन! “अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरेंचा नॅरेटिव्ह खोटा”; लहू बालवडकर-गणेश कळमकर यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.