
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच गहिरा झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल यांनी नियंत्रण रेषा (LoC) आणि इतर धोरणात्मक भागांत आपली हालचाल आणि तैनाती मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे.
भारतीय लष्कर नियंत्रण रेषेवरील पहिल्या रेषेवर सदैव सज्ज असते. मात्र, अलीकडील घटनांमुळे कारवायांत लक्षणीय वाढ झाली आहे. राजस्थानसह विविध क्षेत्रांमध्ये युद्धसराव राबवण्यात येत असून, लष्कराने हाय अलर्ट घोषित केला आहे. तैनाती आणि पुढील हालचालींसाठी सतत आढावा घेतला जात आहे.
दक्षिण काश्मीर व नियंत्रण रेषेच्या आसपास व्हिक्टर फोर्स, राष्ट्रीय रायफल्स आणि पॅरा स्पेशल फोर्सेसच्या तुकड्या सक्रिय आहेत. या विशेष पथकांना घुसखोरीविरोधात तत्काळ कारवाई करण्याची क्षमता आहे.
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानची भ्याड खेळी, हवाई मार्ग बंद; आता कोणते असतील पर्याय?
भारतीय हवाई दलाने संभाव्य हवाई कारवायांसाठी सर्व ऑपरेशनल बेस अलर्टवर ठेवले आहेत. विशेषतः पंजाब, जम्मू व श्रीनगर येथील हवाई तळांवरून Su-30MKI, Mirage-2000 आणि Rafale लढाऊ विमानांची तैनाती करण्यात आली आहे.
जमिनीवरील व हवाई तणावाच्या पलीकडे, भारतीय नौदलाने पश्चिम किनारपट्टीवर आपली उपस्थिती वाढवली आहे.