
PM Narendra modi vishnupur rally target TMC for not accepting nari shakti vandana bill bengal elections
Political News : पश्चिम बंगाल : मोदी सरकारने सादर केलेले महिला आरक्षण (Women Reservation Bill) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर करण्यात आले आहे. यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. या विधेयकातून महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात येणार होते. मात्र हे नामंजूर झाल्याने भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील प्रचारसभेमध्ये मोदींनी (PM Narendra Modi) यावरुन इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेसला महिला खासदार नकोच होत्या म्हणून बील नाकारलं असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील विष्णुपूर येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला. सभेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, “प्रत्येक सभा मागच्या सभेपेक्षा मोठी होत आहे. मला सांगण्यात आले की, लोक २-३ तास बसले आहेत. हे वातावरण, हे प्रेम, हा उत्साह, ही तळमळ, हे आंदोलन या क्रूर सरकारविरोधातील संतापाचे प्रतीक आहे.”
हे देखील वाचा : राजीनाम्याचा लेटर बॉम्ब! साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ; मेळाव्याआधीच संघटनेत भगदाड
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “भाजपची ओळख महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षेशी जोडलेली आहे. म्हणूनच देशातील प्रत्येक राज्यात बहिणी आणि मुली भाजपला सर्वात मोठा आशीर्वाद देतात. विकसित भारताच्या उभारणीत मुलींची भूमिका अधिक व्यापक करणे आणि अधिकाधिक मुलींना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे आमचे ध्येय आहे. संसदेत काय घडले ते तुम्ही पाहिले. टीएमसीने पुन्हा एकदा बंगालच्या भगिनींचा विश्वासघात केला आहे.”अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे.
During the NDA rally in Coimbatore yesterday, explained how the DMK has done injustice to the people of Tamil Nadu… pic.twitter.com/9rcTyuWYZu — Narendra Modi (@narendramodi) April 19, 2026
हे देखील वाचा :देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र फेल…! खासदार राऊतांची जहरी टीका
बंगालच्या कन्या ‘महा जंगलराज’ला देतायेत आव्हान
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, “बंगालच्या महिलांना ३३% आरक्षण हवे होते. मी ते सुनिश्चित केले. बंगालच्या महिलांना ते २०२९ पर्यंत लागू व्हावे असे वाटत होते. मी त्यासाठी प्रयत्नही केले. पण टीएमसीला बंगालच्या कन्या आमदार आणि खासदार व्हाव्यात असे वाटत नव्हते, कारण बंगालच्या कन्या त्यांच्या ‘महा जंगलराज’ला आव्हान देत होत्या. त्यामुळे, टीएमसीने काँग्रेससोबत कट रचून महिलांना ३३% आरक्षण देणारा कायदा मंजूर होऊ दिला नाही.”अशा शब्दांत महिला आऱक्षण विधेयक नामंजूर केल्यामुळे पंतप्रधान मोदींनी तृणमुल काँग्रेसवर निशाणा साधला.