Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहरू, अदानी, संविधान अन् मोदी; पहिल्याचं भाषणात प्रियांका गांधींची संसदेत तुफान फटकेबाजी

प्रियांका गांधी यांनी देशातील व्यवस्था आणि सरकारची उद्योगपदीविषयीची आस्था यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. संसदेतील हे पहिलंच भाषण चांगलंच गाजलं.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 13, 2024 | 06:06 PM
नेहरू, अदानी, संविधान अन् मोदी; पहिल्याचं भाषणात प्रियांका गांधींची संसदेत तुफान फटकेबाजी

नेहरू, अदानी, संविधान अन् मोदी; पहिल्याचं भाषणात प्रियांका गांधींची संसदेत तुफान फटकेबाजी

Follow Us
Close
Follow Us:

काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या नवनिर्वाचीत खासदार प्रियांका गांधी यांचं आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिलं भाषण झालं. आज लोकसभेत संविधानावर चर्चा होती. त्याचाच आधार घेत प्रियांका गांधी यांनी देशातील व्यवस्था आणि सरकारची उद्योगपदीविषयीची आस्था यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांचं संसदेतील हे पहिलंच भाषण चांगलंच गाजलं असून आज देशभर त्यांच्या भाषणाची चर्चा सुरू आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस, उन्नाव आणि संभलसारख्या घटनांचा उल्लेख करत प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सध्याच्या सरकारने संविधान कमकुवत करण्याचं काम केल्याचंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.

…तो आवाज म्हणजे संविधान

‘आपल्या देशात सर्व धर्माची जुनी परंपरा आहे, हजारो वर्षांची ही जुनी परंपरा संवाद आणि चर्चेची आहे. वेद, उपनिषदांमध्ये एक गौरवशाली परंपरा आहे. इस्लाम, जैन आणि शीख धर्मात वादविवाद आणि चर्चेची संस्कृती आहे. या परंपरेतूनच आपला स्वातंत्र्यलढा उभा राहिला. सत्य आणि अहिंसेवर आधारित हा जगातील एक अनोखा लढा होता. आपला स्वातंत्र्यलढा लोकशाहीवादी होता आणि या लढ्यात प्रत्येक वर्ग, जाती, धर्माच्या लोकांनी भाग घेतला. त्या स्वातंत्र्यलढ्यातून एक आवाज उठला, तो आवाज आपल्या देशाचे संविधान आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

“संविधान हा केवळ दस्ताऐवज नाही. या संविधानाच्या निर्मितीमध्ये अनेक नेते वर्षानुवर्षे मग्न होते. या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सरकार बनवण्याचा आणि बदलण्याचा अधिकार दिला आहे. संविधानाच्या धारणेने प्रत्येक नागरिकाला देशाच्या उभारणीत आपलाही वाटा असल्याचा विश्वास प्रदान केला. उन्नावमध्ये बलात्कार घडला होता. त्या पीडितेच्या घरी गेले. तिला जाळून मारण्यात आलं. त्या नराधमांविरोधात पीडितेने एकटीने लढा दिला. आपल्या संविधानाने ही लढण्याची क्षमता आणि हे धैर्य त्या पीडित आणि करोडो महिलांना दिले. हातरसलाही गेले तिथे अरुण वाल्मिकी हा पोलीस ठाण्यात सफाई कामगार म्हणून काम करायचा. त्याला चोरीच्या आरोपावरून मारहाण झाली आणि त्यातचं त्याला मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. आपल्या राज्यघटनेने त्यांना हा अधिकार दिला आहे,”

…तर संविधान बदलाचं काम सुरू झालं असतं

“संविधान हे एक संरक्षक कवच आहे, जे देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवते. न्याय, एकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही ढाल आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांनी गेल्या १० वर्षांत हे संरक्षण कवच तोडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यघटनेत सामाजिक आणि आर्थिक न्यायाचे वचन आहे, ते मोडण्याचे काम सुरू आहे. कदाचीत लोकसभेचे निकाल असे आले नसते तर राज्यघटना बदलण्याचे काम सुरू झालं असतं, असा घणाघात त्यांनी केला.

संपूर्ण जबाबदारी जवाहरलाल नेहरूंची आहे का?

“सत्ताधारी आणि भाजपचे लोक भूतकाळाबद्दल अधिक बोलतात. भूतकाळात काय घडलं? पंडीत नेहरूंनी काय केलं?, पण वर्तमानाबद्दल बोला. देशाला सांगा तुम्ही काय केलं, काय करत आहात? तुमची जबाबदारी काय? संपूर्ण जबाबदारी जवाहरलाल नेहरूंची आहे का? असा सवाल करत, हे सरकार आर्थिक न्यायाचं संरक्षण कवच तोडत आहे. बड्या उद्योगपतींसाठी कृषीकायदे केले जात आहेत. वायनाडपासून ललितपूरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. हिमाचलमध्ये सफरचंद पिकवणारे लहान शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत कारण फक्त एका व्यक्तीसाठी सर्व काही बदललं जात आहे. अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.

 

Web Title: Priyanka gandhi attack on modi government over constitution nehru and adani in parliament winter session constitution debate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 05:48 PM

Topics:  

  • Modi government
  • Priyanka Gandhi

संबंधित बातम्या

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक
1

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

LiveUnstoppable: पोलिसांनी मोर्चा अडवला,राहुल, प्रियांका गांधींसह खासदारांना ताब्यात घेतले…; दिल्लीत राजकारण तापणार
2

LiveUnstoppable: पोलिसांनी मोर्चा अडवला,राहुल, प्रियांका गांधींसह खासदारांना ताब्यात घेतले…; दिल्लीत राजकारण तापणार

Robert Vadra यांच्या अडचणीत वाढ; ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे, ‘ते’ 58 कोटी नेमके मिळवले कसे?
3

Robert Vadra यांच्या अडचणीत वाढ; ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे, ‘ते’ 58 कोटी नेमके मिळवले कसे?

लाभार्थ्यांना १२,००० कोटींचे अनुदान; प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल
4

लाभार्थ्यांना १२,००० कोटींचे अनुदान; प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.