Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी डोळे काढले, हात-पाय बांधले, अत्याचार करून विकृत पद्धतीने तरुणीची हत्या; अयोध्येतील प्रकारानंतर राहुल गांधीं कडाकडले

अयोध्येत एका तरूणीवर लैंगिक अत्याचार करत विकृत पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ माजली. तरुणीच्या हत्येनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 02, 2025 | 11:51 PM
आधी डोळे काढले, हात-पाय बांधले, अत्याचार करून विकृत पद्धतीने तरुणीची हत्या; अयोध्येतील प्रकारानंतर राहुल गांधीं कडाकडले

आधी डोळे काढले, हात-पाय बांधले, अत्याचार करून विकृत पद्धतीने तरुणीची हत्या; अयोध्येतील प्रकारानंतर राहुल गांधीं कडाकडले

Follow Us
Close
Follow Us:

अयोध्येत एका तरूणीवर लैंगिक अत्याचार करत विकृत पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ माजली. तरुणीच्या हत्येनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या घटनेचा निषेध करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. तसेच सोशल मीडियावर पोस्ट करत घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांनी अयोध्येत घडलेल्या घटनेला लज्जास्पद म्हटलंय. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत मुलीवर घडलेल्या लैंगिक अत्याचारावर निषेध व्यक्त केला आहे.राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, ‘तीन दिवसांपासून मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या मदतीच्या हाकेकडे प्रशासनाने लक्ष दिले असते, तर कदाचित तिचे प्राण वाचू शकले असते. आणखीन एका अपराधामुळे एका मुलीचा मृत्यू झाला आहे. अजून किती दिवस आणि किती कुटुंबियांना जाच सहन करावा लागेल आणि मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागेल?’ असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी उपस्थित केला आहे.

बहुजन विरोधी भाजप राजवटीत विशेषत: उत्तर प्रदेशात दलितांवरील घृणास्पद अत्याचार, अन्याय आणि हत्येचे प्रमाण वाढत आहे. उत्तर प्रदेश सरकारने या गुन्ह्याची तातडीने चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि जबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई करावी. कृपया नेहमीप्रमाणे पीडित कुटुंबाला त्रास देऊ नका. देशातील मुली आणि संपूर्ण दलित समाज तुमच्याकडे न्यायासाठी पाहत आहे’, असंही त्यांनी म्हटलं आहे.

खासदाराला रडू कोसळलं

अयोध्येत एका तरुणीवर अत्याचार करून अतिशय विकृत पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडली आहे. तरुणीच्या हत्येनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या प्रकाराचा घटनाक्रम सांगताना अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद पत्रकार परिषेदत ढसा ढसा रडले.

अयोध्येत घडलेल्या प्रकारानंतर खासदार अवधेश प्रसाद यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. पत्रकार परिषदेदरम्यान खासदार अवधेश प्रसाद यांना रडू कोसळलं. तरुणीला न्याय मिळाला नाही, तर राजीनामा देऊ, असा इशारा खासदार प्रसाद यांनी दिला. खासदार प्रसाद भर पत्रकार परिषदेत धाय मोकलून रडले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अयोध्येत घडलेल्या प्रकारानंतर खासदार अवधेश प्रसाद यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. पत्रकार परिषदेदरम्यान खासदार अवधेश प्रसाद यांना रडू कोसळलं. तरुणीला न्याय मिळाला नाही, तर राजीनामा देऊ, असा इशारा खासदार प्रसाद यांनी दिला. खासदार प्रसाद भर पत्रकार परिषदेत धाय मोकलून रडले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, ‘अयोध्येत दलित तरुणीसोबत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अयोध्येत दलित तरुणीची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तीन दिवस तिच्या कुटुंबीयांनी मदतीची याचना केली. प्रशासनाने तिच्या कुटुंबीयाकडे मागणीकडे लक्ष दिलं असतं, तर तिचा जीव वाचला असता. देशात आणखी एका तरुणीचा अंत झाला आहे. आणखी किती कुटुंबाना जाच सहन करावा लागेल?’

राहुल गांधी यांनी पुढे म्हटलं की, ‘बहुजन विरोधी भाजपच्या राज्यात विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये दलितांवर अत्याचार, अन्याय होत आहे. त्यांच्या हत्या होण्याचे प्रमाण वाढत आहेत. दोषींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलले पाहिजे. त्यांनी पीडित कुटुंबाला नेहमीप्रमाणे त्रास देऊ नये. देशातील तरुणी आणि संपूर्ण दलित समाज न्याय मागत आहे’, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.

अयोध्येत तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. या घटनेच्या विरोधात राजकीय वर्तुळातही पडसाद उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी गुरुवारी रात्री १० वाजता धार्मिक कार्यक्रमाला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, तरुणी पुन्हा घरी परतलीच नाही. शोधाशोध केल्यानंतर पोलिसांनी तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तीन दिवसांनी तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला. तिचे डोळे काढले होते. हात-पाय दोरीने बांधले होते. चेहरा आणि कपाळावर गंभीर जखमा होत्या. तिच्या शरीराचे हाडे मोडली होती. तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

Web Title: Rahul gandhi calls for justice to bjp on ayodhya girl killed after physicaly abuse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 11:50 PM

Topics:  

  • ayodhya
  • Rahul Gandhi
  • UP Crime

संबंधित बातम्या

Parliament Budget Session: संसदेत राडा! विरोधी पक्षांचे ८ खासदार निलंबित; नेमकं झालं काय?
1

Parliament Budget Session: संसदेत राडा! विरोधी पक्षांचे ८ खासदार निलंबित; नेमकं झालं काय?

Budget Session 2026: माजी CDS मनोज नरवणे यांचे पुस्तक का प्रकाशित होऊ दिले नाही? राजनाथ सिंहांनी दिले उत्तर
2

Budget Session 2026: माजी CDS मनोज नरवणे यांचे पुस्तक का प्रकाशित होऊ दिले नाही? राजनाथ सिंहांनी दिले उत्तर

Four Star of Destiny Book : जनरल नरवणे यांच्या पुस्तकात असं आहे तरी काय? ज्यावरुन संसदेमध्ये पेटला वाद
3

Four Star of Destiny Book : जनरल नरवणे यांच्या पुस्तकात असं आहे तरी काय? ज्यावरुन संसदेमध्ये पेटला वाद

संसद हादरली! “…काय साध्य करायचे आहे?” राहुल गांधींच्या चीनच्या ‘त्या’ मुद्द्यावर संरक्षणमंत्र्यांचा विरोध
4

संसद हादरली! “…काय साध्य करायचे आहे?” राहुल गांधींच्या चीनच्या ‘त्या’ मुद्द्यावर संरक्षणमंत्र्यांचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.