Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पंतप्रधान ध्यान-साधनेला बसले अन् सूर्यदेव शांत झाले”, रवी किशन यांचा अजब दावा

Ravi kishan on narendra modi : आज शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु असून मतदान केल्यानंतर भाजप खासदार आणि उमेदवार रवी किशन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधनेबद्दल अजब दावा केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 01, 2024 | 05:40 PM
“पंतप्रधान ध्यान-साधनेला बसले अन् सूर्यदेव शांत झाले”, रवी किशन यांचा अजब दावा
Follow Us
Close
Follow Us:

लोकसभा निवडणुकीच्या ( loksabha election 2024) रणधुमाळी आज (1 जून) शेवटच्या टप्प्यात मतदान सुरु आहे. शेवटच्या टप्प्यात देशातील 8 राज्यांमध्ये एकूण 57 जागांवर मतदान सुरु आहे. मतदानाच्या अंतिम टप्प्यानंतर काही मिनिटात एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील. याचदरम्यान भाजप खासदार आणि उमेदवार रवी किशन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान साधनेबद्दल अजबच दावा केला आहे. त्यांच्या या वक्त्यव्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे.

गोरखपूरचे भाजप उमेदवार रवी किशन यांचे एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्याकुमारीतील ध्यान आणि उष्माघाताबद्दल सांगितले. रवी किशन यांना सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कन्याकुमारीमध्ये साधना करून सूर्यदेवाला शांत केले आहे.

काय म्हणाले रवि किशन?

गोरखपूरमध्ये मतदान केल्यानंतर भाजप खासदार आणि उमेदवार रवी किशन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, “पीएम मोदींनी कन्याकुमारीमध्ये साधना करून सूर्यदेवाला शांत केले आहे. आज कडक उन्हात वारे वाहू लागले आहेत. हे रामराज्याचे फार मोठे लक्षण आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी प्रचंड फॉर्मात येतील आणि माझा भारत खूप विशाल आणि विकसित होईल, सोने की चिड़िया होईल, भारत कधीही झुकणार नाही, भारतासमोर लोक झुकतील.” असं यावेळी रवि यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर रवी किशनचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अति उष्माघात आणि उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणावरून रवी किशन यांना ट्रोल केले जात आहे.

उल्लेखनीय आहे की, शुक्रवारी उत्तर प्रदेशात उष्माघातामुळे देशभरात ३२० हून अधिक मृत्यू झाले आहेत. येथे उष्णतेच्या लाटेमुळे अवघ्या एका दिवसात १९९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १९ मतदान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: Ravi kishan on narendra modi bjp ls candidate ravi kishan after casting vote in gorkhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2024 | 05:40 PM

Topics:  

  • Lok sabha elections 2024
  • PM Narendra Modi
  • ravi kishan

संबंधित बातम्या

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब
1

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
2

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य
3

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य

भाजपा सरकारकडून तरुणांची फसवणूक, कुठे गेले वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन? काँग्रेसचा सवाल
4

भाजपा सरकारकडून तरुणांची फसवणूक, कुठे गेले वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन? काँग्रेसचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.