भाजपाने जनतेचा विश्वासघात केला; सिद्धरामय्या यांचा आरोप
बंगळुरु : गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यातच आता कर्नाटकातून राजकीय घडामोड समोर आली आहे. ‘केंद्राला पाठिंबा देणारे भाजप नेते राज्यातील जनतेचा विश्वासघात करत आहेत, मग ते प्रल्हाद जोशी असोत किंवा अन्य कोणीही’, असा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी केला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, कर्नाटकातून अनेक खासदार गेले आहेत. त्यांनी आवाज उठवण्याची गरज आहे. मात्र, त्यांनी तसे केले नाही. पाच वर्षांत राज्याचे केंद्रीय कराच्या वाट्यामध्ये 60 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सरकारच्या पुढील पावलाबद्दल विचारले असता, सिद्धरामय्या म्हणाले की, ते त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करू, असे उत्तर मिळाले. शनिवारी या मुद्द्यावर दिलेल्या निवेदनात सिद्धरामय्या यांनी प्रश्न उपस्थित केला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गुरुवारी १६ एप्रिल २०२२ रोजी हुबळी शहरात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावाविरुद्ध दाखल केलेला फौजदारी खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, राज्याच्या भाजप खासदारांवर केंद्रीय करांमध्ये राज्याच्या वाट्याबाबत अन्याय केल्याचा आरोप केला. राज्यावर होत असलेल्या या अन्यायाविरोधात जनतेने आवाज उठवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
कर्नाटकला 6498 कोटी तर उत्तर प्रदेशला 31987 कोटी
कर्नाटक राज्याला ६,४९८ कोटी रुपये मिळाले आहेत. तर उत्तर प्रदेशला ३१,९८७ कोटी रुपये मिळाले आहेत, जे केंद्रीय करांमधील दोन्ही राज्यांच्या वाट्यामध्ये मोठी तफावत दर्शवते. कर्नाटकावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध जनतेने आवाज उठवण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.