Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार? रायपूरमधल्या अधिवेशनात दिले संकेत, म्हणाल्या…

आपल्या भाषणादरम्यान सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला सगळ्यात जास्त समाधान आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

  • By साधना
Updated On: Feb 25, 2023 | 04:01 PM
sonia gandhi

sonia gandhi

Follow Us
Close
Follow Us:

रायपूर: छत्तीसगडमधील रायपूर(Raipur) येथे काँग्रेसचे (Congress) 85 वे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात काँग्रेसच्या साधारण 1500 प्रतिनिधींनी हजेरी लावली. या अधिवेशनात काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीदेखील काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

आपल्या भाषणादरम्यान सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला सगळ्यात जास्त समाधान आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. सोनिया गांधींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

[read_also content=”‘लक्ष्य’ फेम अभिजीत श्वेतचंद्रचं शुभमंगल सावधान, सेजल वर्देसह बांधली लग्नगाठ,पाहा Photo https://www.navarashtra.com/movies/abhijeet-shwetchandra-got-married-with-sejal-varde-nrsr-372243.html”]

सोनिया गांधी महाअधिवेशनात म्हाणाल्या की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2004 आणि 2009 साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचं सगळ‌्यात जास्त समाधान आहे.”

भारत जोडो यात्रेचं कौतुक
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची सोनिया यांनी यावेळी स्तुती केली. त्या म्हणाल्या की, राहुल यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेने चांगलं काम केलं आहे. ज्या प्रकारे राहुल यांनी या यात्रेमध्ये लोकांच्या जवळ जात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ते वाखाणण्याजोगं आहे.

मोदी सरकारकडून काही उद्योगपतींना झुकतं माप
काँग्रेस आणि देशासाठी ही खूप आव्हानात्मक वेळ आहे. देशातील प्रत्येक संस्थेवर भाजप- आरएसएसने आक्रमण केलं आहे. काही मोजक्या उद्योगपतींना झुकतं माप दिल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. सध्या अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात असल्याचंही सोनिया गांधी म्हणाल्या. अदानी उद्योग समूहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं आहे. त्यावरून त्यांनी मोदी सरकारवर केलेली ही टीका आहे.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सकाळी साधारण 11 वाजता महाअधिवेशनाची औपचारिक सुरुवात वंदे मातरम गीताने झाली.

Web Title: Sonia gandhi give signals of her poltical retirement nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2023 | 03:58 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Marathi News
  • sonia gandhi news

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
2

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
4

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.